छायाचित्र
छायाचित्र 
विदर्भ

"ती'ची लेखणी चालली नाही, तर बलिदान व्यर्थ गेले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लोक माणुसकी विसरलेत. अशा घटना वाचल्यानंतर जर आपले मन अस्वस्थ झाले नाही तर समजायचे की, आपल्यातली लेखिका जागृत झालेली नाही. स्त्री प्रत्युत्तर देते, बदला घेत नाही. स्त्री नेहमीच अहिंसावादी असते. तिने लेखणीतून संस्कारमय कुटुंबाचे नेतृत्व करावे. अहिल्या, दुर्गा, जिजाऊ घडवाव्यात. कारण स्त्री नेहमीच मानवी जीवनाला समृद्ध करते. "ती'ची लेखणी चालली नाही, तर समजायचे, तयाचे बलिदान व्यर्थ गेले. या भावना व्यक्‍त केल्या आशा पांडे यांनी.
शब्दरंग महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून आशा पांडे बोलत होत्या. धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या एकदिवसीय संमेलनाचे उद्‌घाटन आम्ही लेखिका संस्थेचे अध्यक्ष मोहन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार उपस्थित होते. मंचावर मराठी विभागप्रमुख भारती खापेकर, आम्ही लेखिका संस्थेच्या किरण पिंपळशेंडे, धनश्री पाटील, दीप्ती हांडे, नीता अल्लेवार, वर्षा बोध उपस्थित होत्या. यावेळी आशा पांडे यांनी आपल्या विवेचनातून स्त्रीत्वाची प्रचिती आणून दिली. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. पूर्वी स्त्रियांनी लेखनातून स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. त्यानंतरच्या स्त्रियांनी लेखणीला स्वातंत्र्य दिले. आता न संकोचता संघर्ष करण्याची ताकर लेखणीच्या माध्यमातून निर्माण होण्याची गरज आशा पांडे यांनी व्यक्‍त केली.
मोहन कुलकर्णी यांनी आम्ही लेखिका संस्थेची संकल्पना सांगितली. स्त्री चूल व मूल या चौकटीच्या बाहेर निघाली आहे. आता तिच्या लिखाणाला व्यासपीठ आवश्‍यक असून, हाच संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेची स्थापना एक वर्षापूर्वी झाली असली तरी जगभरातील पाच हजार सातशे ब्याण्णव लेखिका या व्यासपीठाशी जोडल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुरेंद्र जिचकार यांनी भुलाबाईंची आठवण सांगितली. "अडकीत जाऊ, खिडकीत जाऊ, खिडकीत होता बत्ता' अशाच कवितांच्या माध्यमातून त्याकाळच्या लेखिकांनी अंतरमनातील आसवांना वाट मोकळी करून दिली. तसेच आपल्या भोवतालच्या समस्या आजच्या लेखिकांचा मुख्य विषय असावा असे त्यांनी सुचवले. डॉ. भारती खापेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. विजया मारोतकर यांनी केले. आभार दीप्ती हांडे यांनी मानले. संचालन अदिती देशमुख यांनी केले. यानंतर सुप्रसिद्ध कवयित्री सुचित्रा कातरकर यांच्या अध्यक्षतेत कविसंमेलन आयोजित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT