File photo
File photo 
विदर्भ

मजुराला विषबाधा, शेतमालकास नोटीस

सकाळवृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना शेतमजुरास विषबाधा झाल्यामुळे येथील तहसीलदार रवींद्र जोगी यांनी मंगळवारी (ता. 28) शेतमालकास कारवाईची नोटीस बजावली आहे. राज्य सरकारने शेतमजुरांच्या विषबाधेस शेतमालकांना जबाबदार धरले जाईल, असे परिपत्रक काढल्यानंतर अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच कारवाई ठरली आहे. या कारवाईमुळे शेतकरी दडपणात आले आहेत.
तालुक्‍यातील तेजापूर येथील शेतमजूर अंकुश बंडू भोयर (30) याला विषबाधा झाली. ते विजय मालेकार यांच्या शेतात कीटकनाशक फवारणीसाठी गेले होते. परंतु, शेतमालकाने त्यांना कोणतेही संरक्षक साहित्य पुरविले नाही. त्यामुळे विषबाधा झाली. प्रकरण अंगलट येईल म्हणून ज्या दुकानातून कीटकनाशक घेतले होते, त्या कृषिमाल विक्रेत्याच्या मध्यस्थीने एका खासगी रुग्णालयात अंकुशवर उपचार करण्यात आला. प्रकरण मिटविण्याचाही प्रयत्न झाला.
ही बाब कृषी विभागाच्या लक्षात आल्यावर प्रकरण तहसीलदारांकडे गेले. त्यामुळे शेतमालकास नोटीस बजावण्यात आली असून दोन दिवसांत खुलासा मागितला आहे. वापरलेले कीटकनाशक जास्त तीव्रतेचे होते, ते अनधिकृत असण्याची शक्‍यता आहे, जहाल कीटकनाशक फवारताना शेतमजुरास संरक्षित साहित्य पुरविले नाही, त्यामुळे संबंधित मजुरास विषबाधा होण्यास शेतमालकांना जबाबदार का धरले जाऊ नये, अशी विचारणा या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
विषबाधेचा मागील वर्षीचा अनुभव पाहता यावर्षी महसूल व कृषी विभाग गावपातळीवर सभा घेत आहे. फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रशिक्षण देत आहेत. मात्र, काही अपवाद वगळता बहुसंख्य शेतकरी व शेतमजूर काळजी घेताना दिसत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT