बंदिस्त भारतीय अर्थव्यवस्था आता खुली; निती आयोगाचे उपाध्यक्ष्य राजीव कुमार

उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेनुसार जपानी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
India Economy
India EconomySakal

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत मोहिमेमुळे आपली अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वीसारखी बंदिस्त होणार नाही, असे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केले. उलट जागतिक पुरवठा साखळीत भागीदार झाल्याने भारतीय नागरिकांना अच्छे दिन येतील, यावरही त्यांनी भर दिला. उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेनुसार जपानी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. जागतिक तंत्रज्ञान आणि अर्थपुरवठा तसेच भारतीय यंत्रणा यांचा मिलाप झाल्यास भारताला फायदा आहे, असेही ते यासंदर्भातील एका परिसंवादात म्हणाले.

जपानी कंपनांनी भारतात प्रकल्प उभारून भारताला निर्यातीचे केंद्र बनवावे अशी आमची इच्छा आहे. भारतात त्याची पायाभरणी झाली असल्याने जपानी गुंतवणुक येथे यावी यासाठी आम्ही सर्वकाही, करू अशी ग्वाहीदेखील कुमार यांनी दिली. पूर्वीच्या बंदिस्त भारतीय उद्योग आणि अर्थव्यवस्थेत परदेशी कंपन्या-भांडवल यांना फारसा प्रवेश नव्हता. मात्र नरसिंह राव यांनी खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यावर बंदिस्त भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली.

India Economy
रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

पंतप्रधानांची आत्मनिर्भर भारत योजना किंवा उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना यामुळे भारत पूर्वीच्या (परदेशी उद्योगांसाठी) बंद अर्थव्यवस्थेकडे जाणार नाही. आता आपण जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थांशी जुळवून घेतले असून त्यापासून आपण मागे हटणार नाही, अशीही खात्री त्यांनी व्यक्त केली. उलट आता आपण संरक्षण आदी अनेक क्षेत्रे परदेशी गुंतवणुकदारांसाठी खुली करत असल्याचेही त्यांनी दाखवून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com