
कोरोनाचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. आता आरबीआयचा अंदाज मोठी चिंता वाढवणारा आहे.
कोरोनामुळे भारतात मंदीचे सावट; 8.6 टक्क्यांनी घसरू शकतो GDP
नवी दिल्ली: कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील व्यापार ठप्प पडला आहे. त्यामुळे जागतिक अर्थचक्र बऱ्यापैकी थंडावल्याचं दिसत आहे. मागील महिन्यात जगभरातील कोरोना रुग्ण कमी होत होते. पण आता युरोपसोबत अमेरिकेतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे पुढील काळ जागतिक बाजारपेठेसाठी मोठा नुकसानकारक असणार आहे. याचा मोठा फटका भारतालाही बसला आहे.
भारतातही कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं होतं. आता देशात अनलॉकची प्रक्रियाही सुरु झाली आहे. याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला होता. आता आरबीआयने अजून एक चिंता वाढवणारी बातमी दिली आहे. ज्यामध्ये 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी मागील वर्षाच्या तुलनेत 8.6 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यापुर्वीच भारताची आर्थिक परिस्थिती नाजूक स्थितीत आहे.
Gold Prices: तीन दिवसांत 2 वेळा सोन्याचे दर घसरले; आजही सोने, चांदीच्या दरात घट
जर आरबीआयचं भाकित खरं ठरलं तर देशात मोठी आर्थिक मंदी येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयने एप्रिल-जूनमध्ये जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांनी अभूतपूर्व घट नोंदवली. आता जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनाचे (जीडीपी) 8.6 टक्के होण्याचा अंदाज आहे.
आरबीआयने प्रसिद्ध केलेला अहवाल संशोधक पंकज कुमार यांनी तयार केला आहे. अहवालानुसार, तांत्रिकदृष्ट्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली. आता हळूहळू जेव्हा अर्थव्यवस्था सामान्य होत आहेत, अशातच ही जीडीपी घटण्याची बातमी समोर आली आहे.
(edited by- pramod sarawale)
Web Title: Gdp Will Reduced More 8 Percent Second Quarter Said Rbi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..