Ajit Isaac : 'जागतिक मंदीचा भारताला धोका नाही; पुढील काळात देशात सर्वोत्तम रोजगार असतील'

येणाऱ्या काळात 'या' क्षेत्रात नोकरीच्या संधी निर्माण होतील.
Employment
Employmentsakal

भारत उर्वरित जगाच्या मंदीच्या संभाव्यतेपासून लांब आहे आणि सध्याच्या नोकरभरतीचा ट्रेंड असे सूचित करतो की येत्या काही वर्षांत देशात चांगला रोजगार वाढीचा दर असण्याची शक्यता आहे, असे Quess कॉर्पचे संस्थापक अध्यक्ष अजित आयझॅक यांनी सांगितले.

“मंदीच्या संभाव्यतेच्या बाबतीत भारत उर्वरित जगापासून लांब आहे. भारतात 8% वर वाढ होणार नाही. परंतु वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात 2000 ते 2007 दरम्यान रोजगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहिली. जीडीपी 2000 मध्ये 470 अब्ज डॉलर वरून 2007 मध्ये 1.2 ट्रिलियन डॉलरवर गेला", असे आयझॅक यांनी बुधवारी बेंगळुरू येथे जॉब डिस्कवरी पोर्टल मॉन्स्टर इंडियाच्या रीब्रँडिंगची घोषणा करताना सांगितले.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

आयझॅक म्हणाले की, तंत्रज्ञान क्षेत्र आणि इंटरनेट क्षेत्रातील अर्थव्यवस्था वाढणार आहे, सध्या ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीचा सामना करत आहेत, त्यांना आणखी दोन तिमाही संकट जाणवण्याची शक्यता आहे, परंतु आयटी उद्योग थेट 5 दशलक्ष आणि अप्रत्यक्षपणे 5 दशलक्ष लोकांना रोजगार देतो त्यामुळे येणाऱ्या काळात या क्षेत्रात नोकरीच्या संधी निर्माण होतील.

Employment
Share Market : गुंतवणूकदारांना स्टॉक स्प्लिटचे गिफ्ट; केवळ 4 वर्षांत मिळणार 'एवढे' टक्के रिटर्न

भारतात अधिक कनेक्टिव्हिटी, डिजिटायझेशन आणि 5G सेवांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत मोठा फरक पडेल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचार्‍यांना, विशेषत: महिलांना घरून काम करता येईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com