वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरण आवश्यक : एन. चंद्रशेखरन

वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरण आवश्यक : एन. चंद्रशेखरन

नवी दिल्ली : देशातील वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण करणे गरजेचे आहे. तसेच ऊर्जा क्षेत्राला पाठबळ मिळण्याची आवश्‍यकता असल्याचे मत टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केले आहे. सरकारने दूरसंचार क्षेत्रातील संकट दूर केले पाहिजे, त्याचबरोबर गृहनिर्माण क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता त्यांनी बोलून दाखवली.

""सध्या व्यवस्थेत अनेक संकटे आहेत आणि ती लवकरात लवकर दूर केली पाहिजेत. देशातील ऊर्जेची गरज बघता ऊर्जा क्षेत्रातील सर्व प्रकल्प कार्यान्वित झाले पाहिजेत; वेळप्रसंगी त्यांचे खासगीकरण झाले तरी चालेल. गृहनिर्माण क्षेत्राच्या बाबतीत बोलताना शेखरन म्हणाले, सध्या नऊ लाख कोटींपेक्षा जास्त मूल्याची घरे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.

सरकारने गृहनिर्माण क्षेत्रासाठी दिलेल्या 25 हजार कोटी रुपयांच्या मदतीचे त्यांनी कौतुक केले; मात्र सरकारने यासंदर्भात काही पावले उचलली असली, तरी त्याचे परिणाम दिसण्यासाठी काही कालावधी जावा लागेल,'' असे चंद्रशेखरन म्हणाले. ते "मुंबई लिटरेचर फेस्टिव्हल'मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com