15 बिलियन विक्रीचा टप्पा गाठून रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरले |Reliance Industries Shares Fall | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance
15 बिलियन विक्रीचा टप्पा गाठूनही रिलायन्सचे शेअर्स घसरले

15 बिलियन विक्रीचा टप्पा गाठूनही रिलायन्सचे शेअर्स घसरले

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी तेल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने सौदी अरेबियाच्या अरामकोला तेल ते केमिकल्स व्यवसायातील (O2C) भागविक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे. सोमवारी कंपनीचे शेअर्स 4.2 टक्क्यांनी घसरून ₹2,368.20 च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. तसेच त्यांच्या सर्वात फायदेशीर युनिटच्या संभाव्य स्पिनऑफमधून मागे पडले आहेत. जाणून घेऊयात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरण्यामागील प्रमुख कारणे...

रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरण्यामागील 10 कारणे

1. गेल्या दोन वर्षांपासून, अब्जाधीश असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या तेल आणि दूरसंचार समूहाने तेल व्यवसायातील 20 टक्के भागभांडवल सुमारे $15 अब्ज डॉलर्समध्ये अरामकोला विकून त्याचे वेगळे युनिट बनविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, तसेच अक्षय उर्जेच्या दृष्टीने त्यात सुधारणाही केल्या आहेत.

2. गेल्या वर्षी जूनपासून कंपनी कर्जमुक्त राहिली आहे. जेफरीजच्या विश्लेषकांनी सांगितले की, करार रद्द झाल्याचा रिलायन्सच्या ताळेबंदावर काहीही परिणाम होणार नाही, परंतु असे होणे निराशाजनक आहे. कारण यामुळे O2C व्यवसायासाठी $75 अब्ज मूल्याचा बेंचमार्क निश्चित करण्याची संधी गमावली जाऊ शकते.

3. रिलायन्सने अलीकडेच कॅलिफोर्निया स्टेट टीचर्स रिटायरमेंट फंडाच्या विरोधानंतरदेखील अरामकोचे अध्यक्ष यासिर अल-रुमायान यांना बोर्डात समाविष्ट केले होते. दरम्यान, अल-रुमायान यांच्या नियुक्तीकडे सुरुवातीला भागविक्रीची औपचारिकता करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पाहिले गेले होते. मात्र, नंतर या कराराशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

4. "रिलायन्सच्या बिझनेस पोर्टफोलिओच्या बदलत्या स्वरूपामुळे, O2C व्यवसायातील प्रस्तावित गुंतवणुकीचे पुनर्मूल्यांकन करणे दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरेल," असे कंपनीने शुक्रवारी उशिरा स्पष्ट केले. तसेच भारताच्या खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी सौदी अरामकोचा "प्राधान्य भागीदार" राहणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

5. याशिवाय, रिलायन्सने O2C व्यवसाय कंपनीपासून वेगळे करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर (NCLT) दाखल केलेला प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णयही घेतला आहे.

6. रिलायन्सच्या O2C व्यवसायातील भागिदारीमुळे अरामकोला जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इंधन बाजारपेठेत प्रवेश मिळाला असता. त्याशिवाय त्‍यांच्‍या अरेबियन क्रूडच्‍या प्रतिदिन 5 लाख बॅरलसाठीची तयार बाजारपेठ मिळाली असती. तसेच भविष्‍यात डाउन स्‍ट्रीममध्‍ये मोठी भूमिका देऊ केली असती.

7. दीर्घकालीन कच्च्या तेलाचा पुरवठा करार आणि रिटेल आउटलेट्सचे नेटवर्क तयार करण्याच्या योजनेसह झेजियांग येथील चीनच्या सर्वात मोठ्या O2C प्रकल्पात अरामकोचा भागभांडवल आहे. त्यात सिनोपेकसह 1,000 रिटेल आउटलेट्स चालविणारा इंधन रिटेलिंगचा संयुक्त उपक्रम देखील आहे.

8. रिलायन्सच्या O2C उपकंपनीतील गुंतवणुकीमुळे अरामकोला एक समान संधी मिळू शकली असती. तसेच दीर्घकालीन कच्च्या तेलाचा पुरवठा करारासह भारतातील सर्वात मोठ्या O2C प्रकल्पातील भागभांडवल आणि रिलायन्स-बीपी संयुक्त उपक्रमाद्वारे इंधन किरकोळ विक्रीत सहभाग मिळाला असता.

9. गेल्या काही वर्षांमध्ये, ऑइल-टू-टेलिकॉम समूहाने व्यवसायांना वेगळ्या भूमिकांमध्ये विभक्त केले आहे. Jio प्लॅटफॉर्ममध्ये कंपनीचे डिजिटल आणि टेलिकॉम युनिट आहे, तर रिटेल हे एक वेगळे युनिट आहे आणि तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल विभागांना धोरणात्मक पद्धतीने आकर्षित करण्यासाठी O2C क्षेत्रातील भागीदारीसाठी वेगळे दाखविण्यात आले.

10. रिलायन्स इंडस्ट्रीज 30 शेअर्सच्या सेन्सेक्समध्ये अव्वल स्थानावर आहे. कारण सेन्सेक्समध्ये केवळ 250 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली होती जी 751 अंक किंवा 1.26 टक्क्यांपर्यंत घसरली होती.