सत्तेत नसतांनाच निघतात शेतकऱ्यांसाठी पदयात्रा

kisan
kisan

आर्णी - देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि कणा म्हणजे शेतकरी हाच शेतकरी सदानकदा अडचणीत असलेल्याचे चित्र देशात पहायला मिळते. आणि त्याच्या मदतीसाठी पुढे येतात ते राजसत्तेतील विरोधी पक्षाचे नेते मग सत्ता कोणत्याही पक्षाच्या हाती असो विरोधात असणऱ्या पक्षाला मात्र शेतकऱ्यांच्या समस्या शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आर्णी विधानसभा मतदारसंघातील अनेक घटनाक्रम आहेत. 2015 पुर्वी केंद्रात व राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युती सरकार सत्तेत होते.  त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष होता. तेव्हा तत्कालीन खासदार हंसराज अहीर व भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यांतील नेते  शेतकऱ्यांच्या डझनभर समस्या घेऊन तालुक्यातील तरोडा येथुन जिल्हाधिकारी कार्यालयांवर ता 15 व 16 डिसेंबर 2013 ला पदयात्रा काढली. शेतकरी समस्यांचा पाडाच जिल्हाधिकारी यांच्या समोर वाचला सरकारने शेतकऱ्यांचे कशे हाल केले ते निवेदनामधुन मांडले व आम्ही सत्तेत आल्यावर काय करणार यांचे नियोजन केले असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर 20 मार्च 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी तालुक्यातील दाभडी येथे चाय पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी लाईव्ह संवाद साधला सरकार शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करत आहे ते सांगितले. त्यानंतर कापुस व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून खासदार  पाशा पटेल यांनी नागपुर अधिवेशनावर शेतकरी पदयात्रा काढली होती.

याच पदयात्रा व शेतकरी संवादाचा फायदा घेत भारतीय जनता पक्ष  2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला शेतकरी हिताचा पक्षसमजुन केंद व राज्यात सत्ता दिली. आता शेतकऱ्यांचे अच्छे दिन येणार असे वाटले. परंतु काही वर्षांतच हे सरकार सुद्धा शेतकरी विरोधी असल्याचे शेतकऱ्यांसह विरोधी बाकावर बसलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला वाटु लागले. या सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर त्यांचे शोषण केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी हल्ला बोल पदयात्रा काढली. कॉंग्रेसने शेतकरी संघर्ष पदयात्रा काढली. आणि सद्या केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली पांढरकवडा ते दाभडी या पदयात्रेला ता 5 एप्रिल रोजी सुरूवात झाली ती 8 एप्रिल रोजी दाभडी ला दाखल होणार आहे. आणि सत्तेत आल्यावर भारतीय जनता पक्षाने शेतकरी शेतकरी कसे वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांना कसे अडचणीत आणले. दाभडी वरून दिलेले आश्वासन कसे फोल ठरले ते दाखवून देण्यासाठी ह्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु सत्तेबाहेर असणाऱ्यांनाच का शेतकऱ्यांचा जिव्हाळा हा प्रश्न मात्र शेतकऱ्यांना नियमित पडत आहे. कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी शेतकरी समस्या मात्र कायम आहे. शेतकरी फक्त सत्ता स्थापन करे पर्यंत वापरण्यात येणारे माध्यम आहे. त्यांना घेऊन सर्वच पक्ष राजकारण करत असल्याचे चित्र दिसून येत असून शेतकरी मात्र उपेक्षितच रहानार आहे हे तेवढेच सत्य आहे..... 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com