पुणे - कोरोना संसर्गाचा बाऊ करून कोणताही ठोस पर्याय न देता मुंबई, पुण्यासह महत्वाच्या बाजार समित्याच बंद केल्याने राज्यातील भाजीपाला व फळे उत्पादक शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांनी कष्ट आणि भांडवलाचे सिंचन करून केलेला कोट्यवधी रुपयांचा भाजीपाला आणि फळे शेतातच नासत आहेत.
शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी उभारलेल्या आणि अत्यावश्यक सेवेचा भाग असलेल्या बाजार समित्या बंद करण्याचा व्यापारी, आडते यांसारख्या घटकांच्या दबावाखाली घेतलेला निर्णय आततायीपणाचा असल्याची टीका शेतकरी वर्गातून होत आहे. खरेदी-विक्रीच्या विकेंद्रीकरणासह अनेक पर्याय अवलंबून ही व्यवस्था सुरू नाही ठेवली तर शेतकऱ्यांचे नुकसान तर होईलच, त्याचबरोबर पुरवठा साखळी विस्कळित झाली तर ग्राहकांच्याही रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल.
लॉकडाऊनच्या काळात मजूर, वाहतूक, इंधन आदी संकटांवर मात करून मोठ्या शहरांतील बाजारात शेतीमाल पाठवून चार पैसे मिळत होते. परंतु, पुणे, मुंबई आणि यांसारख्या अन्य महत्वाच्या बाजारपेठा बंद केल्याने शेतमाल विक्री व्यवस्थाच कोलमडली आहे. फळे आणि भाजीपाला नाशवंत असल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. थेट विक्रीलाही मर्यादा असल्याने फळे आणि भाजीपाला फेकावा लागणार आहे.
या पिकांना बसतोय फटका
फळे - द्राक्ष, आंबा, मोसंबी, संत्रा, पपई, चिकू, कलिंगड, खरबूज, पेरू, लिंबू
भाजीपाला - मेथी, कोथिंबीर, पालक
फळभाज्या - टोमॅटो, मिरची, कांदा, गवार, गाजर, वांगी, काकडी, भेंडी, कारली, दोडका, शेवगा, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, बाटाटा बीट आदी.
बाजार समित्या ‘बंद'चा परिणाम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.