कोरोनाविरुद्धचे ६० टक्के युद्ध आपण जिंकले; 'आयजेएमआर'चा अहवाल

Corona-Virus
Corona-Virus

पुणे - आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करून आणि संपूर्ण देश लॉकडाउन करून आपण कोरोनाविरुद्धचे ६० टक्के युद्ध जिंकले आहे. आता गरज आहे ती घरगुती विलागिकरणाची, असा निष्कर्ष 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' या शोधपत्रिकेत नमूद करण्यात आला आहे.

चीनमधून संपूर्ण जगात पसरलेल्या 'कोविड-१९' अर्थात कोरोनाच्या बाधित रुग्णांच्या संख्याशास्त्राचा अभ्यास या शोधपत्रिकेत करण्यात आला आहे. जगभरात विमानप्रवासाद्वारे कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे दिल्ली, मुंबई, कोलकता, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद आणि कोची या प्रमुख विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येचा इतर देशातील संख्येशी तुलनात्मक अध्ययन करून अहवालात काही निरीक्षणे मांडण्यात आली आहे. त्यानुसार वेळीच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची केलेली तपासणी, संशयितांचे केलेले विलगीकरण आणि धोका लक्षात घेता थांबविलेली उड्डाणे यामुळे बाहेरून आलेल्या बाधितांच्या संख्येवर ६२ टक्के नियंत्रण मिळविल्याचे अहवालात म्हटले आहे. 

तसेच, प्रवाशांना विलगीकरणात राहण्याच्या दिलेल्या सूचना यामुळे सामाजिक संक्रमण आपल्याला रोखता आले आहे. संक्रमणच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ आरोग्य यंत्रणेवर अवलंबून राहणे धोक्याचे असल्याचे अहवालात म्हटले आहे. नागरिकांनी वैयक्तिक किंवा सामाजिक पातळीवर घेतलेली दक्षता संक्रमण रोखू शकते. नागरिकांना अहवाल दिलासा देणारा असला तरी पुढील कालावधी जास्त जबाबदारीचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com