

Ulhasnagar Crime
ESakal
उल्हासनगर : शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, जुन्या वादाचा राग मनात धरून तलवारीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याने शहर हादरले आहे. रविवारी (ता .८) मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेत दोन तरुण जखमी झाले असून, याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.