
Dnyaneshwari Jayanti 2022 : भाद्रपद वद्य षष्ठी, आज १६ सप्टेंबर दिवशी, वारकरी यंदाची 'ज्ञानेश्वरी जयंती' साजरी करणार आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. अल्प आयुष्यात त्यांनी केलेले काम आज जगाला प्रेरणा देत आहे. संत ज्ञानेश्वरांनी भगवतगीतेचे रूपांतरण मराठीत केले, त्याला 'ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका' म्हणून ओळखले जाते.
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी । कृपा करी हरि तयावरी ।।
स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेशी ।।
तेंचि ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे । भय कळीकाळाचे नाही तया ।। एकाजनार्दनी संशय सांडोनी । दृढ धरी मनीं ज्ञानेश्वरी
ऐतिहासिक नोंदींनुसार, संत ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेवर भाष्य करण्यासाठी, त्यामधील बोध जनसामान्यांपर्यंत पोहचावा म्हणून, रसाळ आणि आपल्या ओघवत्या मराठी भाषेत त्याची निर्मिती केली. तो ग्रंथ सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला.
नंतर त्याच्या अनेकांनी प्रती लिहल्या गेल्या. मात्र त्यामध्ये चूका, शब्द, ओळी गाळणे अशा गोष्टी घडायला लागल्या. म्हणून संत एकनाथ महाराजांनी ग्रंथ शुद्ध केला. ही प्रक्रिया पूर्ण झाली तो दिवस भाद्रपद वद्य षष्ठीचा होता, अशी नोंद आहे. त्यामुळे पुढे वारकरी बांधव दरवर्षी भाद्रपद वद्य षष्ठीला 'ज्ञानेश्वरी जयंती' साजरी करतात.
ज्ञानेश्वरी जयंतीचे आयोजन : मराठी भाषेतून विश्वात्मक देवाकडे जगत्कल्याणासाठी पसायदानाचे अमृतदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये ज्ञानेश्वरी वाचन प्रामुख्याने केल्या जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.