Holi Celebration : होळीला शेणी का जाळतात? काय आहे महत्त्व!

होळीला शेणी जाळण्याचे अनेक फायदे?वाचून तर थक्क व्हाल!
Holi Celebration
Holi Celebrationesakal

होळीचा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. हिवाळा पूर्णपणे संपतो आणि कडक उन्हाळ्याला सुरूवात होते. आपल्या संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्व आहे. होळीच्या मुहूर्तावर कोणतेही शुभ काम केले जात नाही.

होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी केले जाते. या दिवसाबद्दल वेगवेगळ्या समजूती आहेत आणि आजही लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात.

होलिका दहनात शेणी जाळणे शुभ असते. अशीही एक मान्यता आहे. पण असे का केले जाते? यामागे धार्मिक महत्त्व काय आहे? याबद्दल फार कोणाला माहीती नाही. शेणी जाळल्या तरी त्या कोणत्या शेणाच्या असाव्यात याबद्दलही शास्त्रात काही नियम दिले आहेत.

Holi Celebration
Safe Holi Celebration : होळीचे रंग हृदयाचे आरोग्य बेरंग करतील?काय आहे तज्ज्ञांचे मत!

धार्मिक मान्यतांनुसार होलिका दहनात नकारात्मक गोष्टींचा नाश होतो. आणि येणाऱ्या नव्या ऋतूप्रमाणे सर्वकाही नव्याने प्रारंभ होते. म्हणूनच लोक होलिका दहनाने सर्व वाईट गोष्टी जाळून टाकतात. शेणकूट जाळण्यामागील धार्मिक श्रद्धा काय आहे हे पाहुयात.

Holi Celebration
Holi Festival : होळीच्या दिवशी तुमच्या लाडक्या पाळीव प्राण्याला असं ठेवा सुरक्षित

हिंदू धर्मात गाय पूजनीय आहे आणि तिच्या शेणाची देखील पूजा केली जाते. शेणाची पोळी शुभतेचे प्रतिक मानली जाते. त्यांना जाळल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा निघून जाते. म्हणूनच हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा मृतदेहाजवळ शेणींची चिता रचली जाते.  जेणेकरून त्या व्यक्तीच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जावी.

Holi Celebration
Holi Festival 2023 : नागपूरकरांनो, होळी पेटवताना घ्या रस्त्यांची काळजी

केवळ या कार्यात नाही तर कोणतेही धार्मिक कार्य असेल तर होम हवनमध्ये शेणी जाळल्या जातात. हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते आणि शेण हे पवित्रतेचे प्रतीक देखील मानले जाते. आजही ग्रामीण भागात चूल पेटवताना लोक सरपण म्हणून शेणीचा वापर करतात.

गायीच्या शेणी
गायीच्या शेणीesakal
Holi Celebration
Holi Celebration  : गब्बरनं सत्तर वर्षांपासून या गावाला विचारलंच नाही, ‘होली कब है’!

शेणाचा वापर केल्याने घरात समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. अनेक वेळा गाईच्या शेणाचा वापर वनौषधी बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे होलिका दहनात शेण जाळल्यास आजूबाजूची सर्व वाईट गोष्टी, नकारात्मक ऊर्जा आणि वाईट रोगांचाही नाश होतो.

Holi Celebration
Holi Celebration : होळी खेळायचा प्लॅन केलाय? आधी हे वाचाच

शेणामूळे रोग पळून जातात

शेणाच्या शेणातून निघणारा धूर वातावरणातील प्रदूषित कण नष्ट करतो. तसेच, हानिकारक जीवाणू देखील मरतात आणि शेणाच्या पोळीच्या धुरामुळे वातावरण शुद्ध होते. म्हणून ते जाळल्याने आपल्याला फायदेच होतात. त्यामुळेच आजही होलिका दहनात शेणी जाळली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com