गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंडाचे महत्त्व...

गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारच्या जेवणात श्रीखंड असतेच.
Shrikhand
ShrikhandSakal
Summary

गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारच्या जेवणात श्रीखंड असतेच.

गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारच्या जेवणात श्रीखंड असतेच. उन्हाळ्यातील उष्णतेशी सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्‍ती चांगली टिकून राहावी यासाठी आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले श्रीखंड हे रसायनाप्रमाणे उपयोगी ठरत असते. आयुर्वेदात श्रीखंडाला ‘रसाला शिखरिणी’ असे नाव दिलेले आहे.

यामध्ये पाणी निथळून गेलेले दही म्हणजे चक्का, मध, तूप, साखर, दालचिनी, नागकेशर, वेलची, तमालपत्र, मिरे, सुंठ ही घटकद्रव्ये असतात. यांचे गुण याप्रमाणे...

  • दही : कफवर्धक, पचायला जड, वातशामक, शरीराला स्निग्धता देणारे, पुष्टिकर

  • मध : कफदोषशामक, पचायला हलके, आवाज सुधारणारे, प्रमाणापेक्षा अधिक असणाऱ्या मेदाला कमी करणारे, रुचकर, रुक्ष

  • तूप : शक्‍तिवर्धक, श्रमांचा परिहार करणारे, वात-पित्तशामक, शरीराची कांती वाढविणारे, शरीराला दृढ करणारे, वीर्यवर्धक

  • साखर : वात-पित्तशामक, शीत गुणाची, वीर्यशक्‍ती वाढविणारी, चक्कर व थकवा यांना दूर करणारी, दाह कमी करणारी

  • दालचिनी, नागकेशर, वेलची व तमालपत्र ही चार द्रव्ये मिळून ‘चातुर्जात’ गण तयार होतो. हा कफनाशक, रुचिवर्धक, आमपाचक असा असतो.

  • मिरे व सुंठ : हे दोघेही चवीला तिखट, अग्निवर्धक, पाचक व कफनाशक असतात.

हे गुण पाहिले असता लक्षात येते की दही जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे की त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही. दह्यातील इतर गुण मात्र वृद्धिंगत होतात.

गुढीपाडवा उत्साहाने साजरा केला, मुख्य म्हणजे त्यातील परंपरेच्या आरोग्य अर्थ जाणून घेतला आणि त्याला वापर करून घेतला तर येणारे नवीन वर्ष सुख, समृद्धीने युक्‍त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com