Marriage Rituals : ...म्हणून लग्नानंतर बदललं जातं मुलीचं संपूर्ण नाव, हे कारण तुम्हालाही माहिती नसेल

या समाजात लग्नानंतर मुलीचे संपूर्ण नाव बदलले जायचे
Marriage Rituals
Marriage Ritualsesakal

Marriage Rituals : लग्न करून, दोन लोक एकत्र नवीन जीवन सुरू करतात. दोघांना आनंदी संसार थाटण्यासाठी एकमेकांची साथ देत पुढे जावे लागते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर लग्नानंतर सर्व काही बदलते. लग्नानंतर मुलींना त्यांचे घर सोडून एका नव्या घराशी नाते जोडत बऱ्याच गोष्टींची तडजोड करावी लागते. एकढंच नव्हे तर मुलींना त्यांचे आडनाव आणि नाव देखील बदलावे लागते.

लग्नानंतर मुलींचे आडनाव बदलण्याची परंपरा देश-विदेशात सुरू आहे. पण पूर्ण नाव बदलण्याच्या प्रथेने अनेकांना आजही माहिती नाही. पण या प्रथेचे पालन करणारा एक समाज आजही आहे, जिथे वधूचे नाव बदलल्याशिवाय लग्न पूर्ण मानले जात नाही.

या समाजात लग्नासाठी बदललं जातं मुलीचं संपूर्ण नाव

भारतात अनेक समाजाचे लोक राहतात. म्हणूनच परंपरा आणि चालीरीतींमध्ये खूप वैविध्य आहे, आपला भारत देश हा विविध रिती, परंपरा आणि संस्कृतींना समृद्ध आहे. त्याची उत्तम झलक लग्नसमारंभात पाहायला मिळते. प्रत्येक समाजानुसार लग्नाची प्रथा बदलते. सिंधी समजात, लग्नानंतर मुलीला तिचे आडनावच नाही तर पूर्ण नावही बदलावे लागते.

का बदलले जाते वधूचे नाव

सिंधी समाजात लग्न तेव्हाच पूर्ण मानले जाते जेव्हा मुलीचे नवीन नाव पतीच्या नावाशी जोडले जाते. लग्न म्हणजे एखाद्या मुलीसाठी नवीन जन्म झाल्यासारखा असतो, अशी यामागची धारणा आहे. ज्यानंतर तिचे जुने घर परके होते, सर्वात आधी तिच्या पतीचे तिच्याशी असलेले नाते महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत, नववधू नवीन नाव आणि ओळख घेऊन या नवीन जीवनात पाऊल ठेवते.

Marriage Rituals
Marriage Rituals And Science : लग्नाच्या विधीं मागची वैज्ञानिक कारणं माहितीयेत? जाणून घ्या सविस्तर

असे ठेवले जाते वधूचे नाव

वधूचे नाव वराच्या कुंडलीच्या आधारे ठेवले जाते. पंडितजी वराच्या नावाचे एक पत्र काढतात, त्यानंतर वधूचे नवीन नाव ठेवले जाते. वधू स्वतः तिला दिलेल्या पत्रासह स्वतःचे नाव देखील देऊ शकते. (Marriage Rituals)

Marriage Rituals
Marriage Rituals : लग्नात वर-वधूला मेहंदी का लावतात माहितीये? 99% लोकांना माहिती नाही खरं कारण

लग्नासाठी नाव आडनाव बदलणे गरजेचे आहे काय?

काळानुसार प्रत्येक समाजाच्या चालीरीतींमध्ये बदल होत गेले. (Culture) हळूहळू मुलींनी आडनाव काढणे बंद केल्याने आता सिंधी समाजातही नाव बदलण्याची परंपरा कमी होत चालली आहे. यामागचे एक कारण म्हणजे आता अधिकृतपणे नाव बदलणे फार कठीण झाले आहे. आणि वेगवेगळ्या नावांमुळे अनेक वेळा कागदपत्रांमध्ये अडचणी येतात, त्यात पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो. म्हणूनच लग्नाच्या वेळी मुलींनी नवीन नाव ठेवले तरी ते त्यांची अधिकृत ओळख बनवत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com