Pitru Paksh 2022 |...या कारणामुळे श्राद्धाला भाताचे पिंड बनवतात

Sarva Pitru Amavasya
Sarva Pitru Amavasya Esakal
Updated on

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात पितृपक्ष साजरा केला जातो. या काळात पितरांचे आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी श्राद्धादी कर्म केले जातात. श्राद्ध कर्मामध्ये पिंडदानाला विशेष महत्व दिले जाते. मात्र या काळात पिंडदान का आणि ते पिंड भाताचेच का केले जातात असा प्रश्न आपल्याला पडतो. याचे उत्तर आपण धर्म अभ्यासकांकडून जाणून घेवूया.

Sarva Pitru Amavasya
Sarva Pitru Amavasya: सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी कोणते 12 श्राद्ध घातले जातात?

भाताचे पिंड करण्यामागे विशेष शास्त्रीय कारण

श्राद्ध कर्मासाठी भाताचेच पिंड का केले जातात यावर धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, पिंडदान हा पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी सहजसोपा मार्ग मानला जातो. पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद प्राप्तीसाठी तर्पणासह पिंडदान श्राद्ध पितृपंधरवड्यात केले जाते. यात भाताचे पिंड करण्यामागे विशेष शास्त्रीय कारण आहे.

Sarva Pitru Amavasya
Pitru Paksha 2022 | जाणून घ्या कावळ्याला अन्न देण्याचे पर्यावरणपुरक महत्व

भातामध्ये वापरले जाणारे तांदूळ हे सर्वसमावेशक आहे. अनेक धार्मिक कर्मांमध्ये हवनावेळी भाताची आहुती दिली जाते. भाताला हवी अन्न म्हटले गेले आहे. वेद, पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे. त्यामुळे कुठल्याही धार्मिक कर्मामध्ये भाताला विशेष महत्व आहे. भातातील आद्रतादर्शक प्रभावाने वातावरणात प्रवेश करणे सोपे होते. यामुळे वायुरुपात पृथ्वीवर अवतरलेल्या पितरांपर्यंत ते पोहचते म्हणून श्राद्ध करतेवेळी भाताचे पिंड तयार केले जातात.

Sarva Pitru Amavasya
Pitru Paksha 2022 | भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष का..? जाणून घ्या कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com