
Wedding Traditions : भारतात जेवढे प्रांत तेवढ्या पध्दती आहेत. त्यात प्रत्येक प्रांताची आपली अशी वेगळी खासियत, रुढी परंपरा आहेत. लग्नांच्या पध्दतीही वेगवेगळ्या आहेत. पण एक पध्दत मात्र बहुतांश ठिकाणी बघायला मिळते, ती म्हणजे पाठवणीच्या वेळी तांदूळ उधळणे. काय आहे यामागचं कारण, जाणून घ्या.
लग्न हे शुभकार्य असतं. त्याच्या प्रत्येक विधीत, पध्दतीत आनंदाचं वातावरण असतं. गणेश पुजनापासून याची सुरूवात होते. साखरपुडा, मेंदी, हळद, लग्नाचे विधी, रिसेप्शन अशा सगळ्याच गोष्टी फार आनंदी वातावरणात पार पडतात. पण शेवटी मुलीची पाठवणी करण्याचा क्षण सगळ्यांसाठीच फार भावूक क्षण असतो.
काय असते पध्दत
मुलीची पाठवणी करताना तिला निरोप देताना पुढे चालत, मागे न बघता नवरीच्या हातून मागे तांदूळ उळले जातात. ते तिच्या माहेरच्यांनी विशेषतः आईने झेलावे असे मानले जाते.
का केलं जातं
तांदळाला लक्ष्मीचं प्रतिक समजलं जातं. समृध्दीचं प्रतीक मानलं जातं.
नवरी जाताना ते उधळते कारण या मागे असा विश्वास असतो की, जरी तिचं लग्न झालं तरी माहेच्या सुखसमृध्दीसाठी ती प्रार्थना करते.
मुलीली लक्ष्मीचं रुप मानलं जातं. तिची पाठवणी केली म्हणजे तिच्यासोबत माहेरची लक्ष्मी जाऊ नये. म्हणून त्याचं प्रतिकात्मक रुप तांदूळ ती उधळत जाते. एका अर्थी माहेरची लक्ष्मी तिथेच नांदू दे अशी शुभेच्छा देते.
शिवाय लहानाची मोठी ज्या घरात झाली, तिथे कशाचीच कमतरता भासू नये या शुभेच्छांसह धन्यवाद करण्याचं हे माध्यम समजलं जातं.
तांदूळ समृध्दीचं प्रतीक आहे. आणि जेवणाचाही अभिन्न अंग आहे. त्यामुळे माहेरी अन्नाची कमतरता भासू नये अशी मनोकामनो करत मुलगी सारसरच्या वाटेने निघते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.