मुंबई : गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेला कोरोनाचा कहर सध्या ओसरताना दिसत असून, दुसरी लाटही आटोक्यात आहे. त्यामुळे विमानतळावरील प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये विमानतळावरील प्रवासी तब्बल ६० टक्क्यांनी वाढले आहेत. या कालावधीत दिल्ली आणि दुबईवारी करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. बुधवारी विमानतळाने ३८० विमाने हाताळली, तर मे महिन्यात दिवसाला केवळ १५० विमान उड्डाण होत होते.
जानेवारी ते जूनदरम्यान मुंबई विमानतळावरून ७२ लाख ६२ हजार १५८ प्रवाशांनी ७७ हजार ७९७ विमान फेऱ्यांतून प्रवास केला. यामध्ये ६४ लाख ८७ हजार ६६ प्रवाशांनी देशांतर्गत, तर सात लाख ७४ हजार ९२ प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय विमानांनी प्रवास केला. यासाठी देशांतर्गत ६३ हजार ९९२ तर आंतरराष्ट्रीय १३ हजार ८०५ विमानांचा वापर केला आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाल्याने दुबईला दोन लाख १३ हजार ७०० तर दिल्ली नऊ लाख ४६ हजार ८९० प्रवाशांनी प्रवास केला.
देशांतर्गत- ६४,८७,०६६
आंतरराष्ट्रीय- ७,७४,०९२
दिल्ली- ९,४६,८९०
गोवा- ५,४२,३५०
बंगळूर- ४,३२,१८०
दुबई २,१३,७७०
नेवार्क- ८८,०१०
हिथ्रो- ७५,४७०
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.