Indian Army: भारतीय लष्कराकडून झाली होती एक चूक; जाणून घ्या काय आहे प्रकरण

भारत आणि चीनमधील संबंध बिघडलेले असून प्रत्यक्ष निमंत्रण रेषेवर स्थिती तणावपूर्ण आहे. अशात भारतीय लष्कराकडून एक चूक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Indian Army
Indian Army

नवी दिल्ली- भारत आणि चीनमधील संबंध बिघडलेले असून प्रत्यक्ष निमंत्रण रेषेवर स्थिती तणावपूर्ण आहे. अशात भारतीय लष्कराकडून एक चूक झाल्याचं सांगण्यात येत आहे. लाईव्ह हिंदुस्तानने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भारतीय सैनेच्या पश्चिम सैन्यदलाने गोपनीय माहिती सार्वजनिक केली होती. मात्र, काही काळानंतर ही माहिती हटवण्यात आली आहे.(A mistake was made by the Indian Army The video was posted on YouTube)

लष्कराकडून याबाबत अधिकृतरीत्या काहीही सांगण्यात आलेलं नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, लष्कराच्या वेस्टर्न कमांडने १३ जानेवारीला वार्षिक परेड आणि एका कार्यक्रमात शौर्य पुरस्कारा संदर्भात एक व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केला होता. या व्हिडिओबाबत काहींकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर लष्कराने याची दखल घेतली आणि तो व्हिडिओ युट्यूबवरुन हटवला आहे. गोपनीय माहिती सार्वजनिक न करण्याचा नियम असतो. पण, लष्कराच्या वेस्टर्न कमांडकडून ही चूक झाली होती.

Indian Army
इस्राइलचा मोठा निर्णय! मुंबईवर हल्ला करणारी 'लष्कर-ए-तोयबा' दहशतवादी संघटना घोषित

२०२० मध्ये ५-६ मे रोजी पूर्व लडाखच्या पैंगोंग त्सोजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात पुन्हा एकदा दोन्ही गटाच्या सैनिकांमध्ये हिंसा झाली होती. ज्यात २० जवान शहीद झाले होते, तर चीनने आकडेवारी जाहीर केली नव्हती. तेव्हापासून भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. माहितीनुसार, पूर्व लडाखमध्ये भारताने ५० हजार सैन्यासह शस्त्रास्त्र तैनात केले आहेत. अद्याप दोन्ही देशात तणाव कायम आहे.

Indian Army
Explainer: निवडणुकीला 24 तास.. विरोधकांचा बहिष्कार.. लष्कर रस्त्यावर; बांगलादेशमध्ये काय सुरुंय? भारताचा काय संबंध?

विशेष म्हणजे ४५ वर्षानंतर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पहिल्यांदा हिंसक झडप झाली होती. २०२० पूर्वीसारखी स्थिती प्राप्त करण्यासाठी भारत आणि चीनच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. पण, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. भारत जैसे थे परिस्थितीसाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, लष्कर प्रमुख मनोज पांडे मागील आठवड्यात म्हणाले होते की, एलएसी म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती स्थिर असली तरी संवेदनशील आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com