
पंजाबमध्ये (Punjab) सध्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसची (Congress) सत्ता असलेल्या असलेल्या या राज्यात सध्या आम आदमी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. शेतकरी आंदोलनामुळे भाजप बॅकफुटला असल्यानं काँग्रेस आणि आम आदमी (AAP) पक्षामध्येच मुख्य लढत असल्याचं चित्र पंजाबमध्ये दिसून येतंय. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनीही (Priyanka Gandhi) आता आपवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीं यांनी यावेळी टीका करताना, 'आम आदमी पक्ष RSS मधून उदयास आल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत शैक्षणिक आणि आरोग्यसेवांच्या नावावर काहीही नाही. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल सत्य जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.' अशी परखड टीका प्रियंका गांधी यांनी यावेळी केली आहे. प्रियंका गांधी पंजाबमधील कोटकपुरामध्ये 'नवी सोच नवा पंजाब' या रॅलीला संबोधित केलं.
प्रियंका गांधींनी यावेळी भाजपवर टीका करताना म्हटलं की, "मी माझा भाऊ राहुलसाठी बलिदान देऊ शकते. राहुलही माझ्यासाठी जीव देऊ शकतो. योगी जी, मोदी जी आणि अमित शहा यांच्यात वाद असू शकतात. संघर्ष भाजपमध्ये आहे, काँग्रेसमध्ये नाही."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.