अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून!

अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून!

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनवाद प्रकरणाची आज (बुधवार) सुनावणी झाली. नियोजित वेळेच्या एक तासापूर्वीच याची सुनावणी पूर्ण झाली. याप्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आता या प्रकरणाचा पुढील निकाल 23 दिवसानंतर मिळणार आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या माध्यमातून न्यायालयात या खटल्याची ही सुनावणी पार पडली. अयोध्या प्रकरणी सुनावणीचा काल (मंगळवार) 39 वा दिवस होता. तसेच सर्व पक्षकारांनी आपला युक्तिवाद बुधवारी पूर्ण करण्याचे आदेशही काल झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आले होते. त्यामुळे आज अंतिम युक्तिवाद केला गेला. अयोध्येत या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आले आहे.

सरन्यायाधीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी माजी ऍटर्नी जनरल आणि ज्येष्ठ विधिज्ञ के. पराशरन यांनी हिंदू पक्षकारांची बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com