
काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांच्यास अनेक खासदारांना घेऊन तिरुवनंतपुरमहून नवी दिल्लीला येणारं विमान अचानक चेन्नईला वळवण्यात आलं. रविवारी रात्री हवामान बिघडल्यानं आणि तांत्रिक त्रुटींमुळे हा निर्णय घेतला होता. चेन्नईला विमान वळवलं पण तिथे उतरवण्याच्या वेळी एकाच रनवेवर दोन विमानं आल्याचं समजल्यानं काही काळ विमान हवेतच थांबवावं लागलं. यामुळे खासदारांसह प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.