Air India Flight : उड्डाण करतानाच एअर इंडियाच्या विमानात बिघाड, मुंबईला येणाऱ्या १६० प्रवाशांचा जीव टांगणीला अन्...

Air India Flight : दिल्ली विमानतळावर एक मोठा अपघात थोडक्यात टळला. त्यांनी सांगितले की, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान रात्री ११:२० वाजता मुंबईला निघणार होते, ते अचानक धावपट्टीवर थांबले आणि बे मध्ये परतले.
Air India Flight Issue
Air India flight esakal
Updated on

Air India Flight Issue: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दिल्ली विमानतळावर देखील बुधवारी एक घटना समोर आली. सुमारे १६० प्रवाशांसह मुंबईला येणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान दिल्ली विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आले. पण एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, दिल्लीहून येणाऱ्या विमानाच्या कर्मचाऱ्यांनी किरकोळ तांत्रिक बिघाडानंतर सुरक्षिततेला प्राधान्य देत उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com