Myanmar Airstrike : म्यानमारचे बंडखोरांवर हवाई हल्ले

मिझोराम सीमेवरील गावात घबराट; बांगलादेश, थायलंड सीमेवरही तणाव
Airstrikes Myanmar soldiers on rebel camps near Indian border delhi
Airstrikes Myanmar soldiers on rebel camps near Indian border delhisakal

नवी दिल्ली/एेजॉल : म्यानमारच्या सैनिकांनी भारतीय सीमेलगत असलेल्या बंडखोरांच्या छावणीवर मंगळवारी हवाई हल्ले केले. यात बंडखोरांच्या संघटनांतील काही जण मारले गेल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे भारतीय सीमेवरील मिझोरामच्या चम्फाई जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले. तसेच बांगलादेश, थायलंड सीमेलगतही हवाई हल्ले झाल्याचे वृत्त आहे.

मिझोराम म्यानमार सीमेवर असलेल्या चीन स्टेटमधील चीन नॅशनल आर्मीच्या व्हिक्टोरिया कॅम्पवर म्यानमारच्या सैनिकांनी हवाई हल्ले केले. हे हल्ले रात्री उशिरापर्यंत सुरू हेाते. या हल्ल्यामुळे मिझोरामच्या चम्फाई जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले. जिल्ह्याच्या एका अधिकाऱ्याने हवाई हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगितले.

म्यानमारने अन्य भागात हवाई हल्ले केल्याने बांगलादेश आणि थायलंड सीमेवर तणावाचे वातावरण झाले. चीन स्टेट मानवी हक्क संघटनेने या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनीम्हटले, की या हल्ल्यात त्यांचे पाच कार्यकर्ते मारले गेले. यात दोन महिलांचा समावेश आहे. हल्ल्यानंतर छापासत्रही राबविण्यात आले.

चीन स्टेट नॅशनल आर्मीने म्यानमारच्या सैनिकी शासकांविरुद्ध बंड पुकारले आहे. त्यामुळे म्यानमारच्या सैनिकांनी हवाई हल्ले केले. मिझोराम राज्याजवळ असलेल्या व्हिक्टोरिया छावणीत सीएनएचे मुख्यालय आहे. दरम्यान, म्यानमारधील कॅम्प व्हिक्टेरियापासून दोन ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मिझोरामच्या फारकॉन गावातील रहिवासी बॉम्बचा आवाज ऐकून भयभीत झाले.

टियाउ नदीच्या भारतीय किनाऱ्यावर काम करणारे नागरिक बॉम्बचा आवाज ऐकून घराकडे पळाले. यासंदर्भात भारताकडून कोणतिही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र लष्कराच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारचा एक बॉम्ब नदीत पडला. यात नदी किनाऱ्यावरील ट्रकची हानी झाली.

बंडखोर मिझोराममध्ये पळाले

चीन राज्यातील सततच्या यादवी युद्धामुळे मिझोरामवासीयांना तेथील नागरिक आणि बंडखोरांबद्धल सहानभुती आहे. बंडखोरांना मदत करण्यासाठी मिझोराम-म्यानमार सीमा हा एक मार्ग असून या ठिकाणाहून शस्त्राची तस्करी, पुरवठा, बंडखोरांना वैद्यकीय मदत दिली जाते आणि याकडे स्थानिक प्रशासनाकडून काणाडोळा जातो.

सैनिकी शासन आल्यापासून सुमारे ६० हजार नागरिक भारतात पळून गेले असून मिझोराममधील ६० निर्वासितांच्या छावण्यात ते राहत आहेत. काहीवेळा जखमी बंडखोर उपचारासाठी मिझोराममध्ये जात असल्याचे म्यानमारचे म्हणणे आहे.

दरम्यान, कॅम्प व्हिक्टोरिया येथे काल छापा घातल्यानंतर डझनभर बंडखोर भारतात पळून गेल्याचे सांगितले तसेच हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बंडखोरांवर मिझोरामच्या डॉक्टरांनी म्यानमारमध्ये येऊन उपचार केल्याची माहिती दिली. हवाई हल्ल्याच्या निषेधार्थ चीन स्टेटमध्ये बंद पाळण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com