नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh)लाल टोपी म्हणजे बदल घडविण्याचा रंग आहे. यूपीला बदल पाहायचा आहे. भाजपकडून जी आश्वासने दिली गेली, ते केवळ जुमले आहेत. ती सातत्याने खोटे बोलत असल्याचा आरोप, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी योगी सरकारवर केला आहे. ते आज एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. यादव पुढे म्हणतात, त्यांनी लोकांची दिशाभूल केली आहे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलीत का? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? तरुणांना नोकऱ्या मिळाल्यात का?, अशा प्रश्नांचा भडिमार त्यांनी उत्तर प्रदेशसह केंद्र सरकारवर केला. जे सार्वजनिक मालमत्ता विकत आहेत ती लाल रंगामुळे अस्वस्थ आहेत. हेच सरकार ते विकत आहे. (Samajwadi Party)
एकूण तर सरकारचा जुमला आणि आता हे 'बेचू सरकार'ही होत आहे. ते बोलत आहेत कारण त्यांना वास्तव मुद्द्यांवर चर्चा करायची नाही, अशी टीका आखिलेश यादव यांनी योगींसह भाजपवर केली. पंतप्रधानांना खूप-खूप धन्यवाद ! कारण ते आमच्या पक्षाचा प्रचार करित आहेत, असा टोला समाजवादी पक्षाच्या खासदार तथा अभिनेत्री जया बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.