मुंबई : नेहमीच भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या अक्षय कुमारने आश्चर्यकारक गोष्ट केली. दिल्लीत जामीया मिलीया विद्यापीठात गदारोळ सुरू असतानाच सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटलेले दिसतात. अशातच अभिनेता अक्षय कुमारने भाजपविरोधात असलेल्या आंदोलनाचे ट्विट लाईक केले अन् मग काय....
अक्षय कुमार नेहमीच भाजप सरकारचे कौतुक करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी त्याने पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतली होती. यावरूनही अक्षय भाजपचे समर्थन करतो, अशा टीका त्याच्यावर केल्या गेल्या. आज त्याने एक ट्विट केले. त्यात त्याने त्याची चूक मान्य केली. काय आहे ही चूक? आणि असे काय घडले की अक्षयने असे ट्विट केले...
अक्षय कुमारने ट्विट केले आहे की, 'ट्विटरवर स्क्रोल करत असताना जामीया मिलीयातील सरकारविरोधी आंदोलनाची एक पोस्ट माझ्याकडून लाईक झाली. मला ती चूक लक्षात आली तेव्हा मी लगेचच ती पोस्ट अनलाईक केली. मी अशा देशविरोधी कृत्यांना कधीच समर्थन देणार नाही.' असे अक्षय म्हणतो. त्याने हे ट्विट केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या गेल्या आहेत. तसेच त्याने हे ट्विट का केले असावे यावरही तर्क सुरू आहेत.
जामिया मिलिया विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढल्याने परिस्थिती चिघळली होती. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत जाळपोळ केली. यानंतर जामीया मीलिया व उत्तर प्रदेशातील अलिगढ विद्यापीठात पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत, तर विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे काही पोलिसही जखमी झाले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.