Alcohol habit : ‘अभी जिंदा हु तो पि लेने दो’; असं म्हणत दरवर्षी दिड लाख लोकं सोडतात जीव!

दारूच्या आहारी जात दरवर्षी तब्बल दिड लाख लोक मृत्यूमुखी पडतात
Alcohol habit
Alcohol habitEsakal

‘अभी ज़िंदा हूँ तो जी लेने दो, भरी बरसात मे पी लेने दो’, असे म्हणत दररोज हजारो लोक दारू पितात. कोणाला गर्लफ्रेंड सोडून गेली याचे, तर कोणाला व्यवसायात अपयश आल्याचे टेंशन येते. त्यामूळे दारूच्या आहारी जात दरवर्षी तब्बल दिड लाख लोक मृत्यूमुखी पडतात.

एका सरकारी आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी सुमारे अडीच लाख लोक मद्यपान केल्यामुळे मरतात. विषारी दारू पिऊन हजारो लोकांचा मृत्यू होतो. इतकं सगळं असूनही भारतात मोठ्या प्रमाणात दारू वापरली जाते आणि सरकारलाही दारूबंदी करावीशी वाटत नाही. याला काय कारण आहे. याचाच एक आढावा घेऊयात.

सध्या देशभर दारूचीच चर्चा आहे. कारण बिहारमध्ये गेल्या काही दिवसात दारू पिऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. छापरा, सारण, बेगुसराय येथे बनावट दारू पिऊन अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे आकडे दाखवतात की 2016 ते 2021 दरम्यान बिहारमध्ये बनावट किंवा अवैध दारू पिऊन 23 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Alcohol habit
Kirit Somaiya : नवीन वर्ष अन् नवे नेते; घोटाळे बाहेर काढणार म्हणत सोमय्यांनी निवडली नावं!

असे चित्र असतानाही सरकार दारू बंदी करत नाही, याला कारण म्हणजे सरकारच्या महसुलात दारूविक्रीचा वाटा 10 ते 15 टक्के आहे. जे दारू बंदी न होण्यामागचे प्रमुख कारण आहे.

राज्यात दारू बंदी असल्याने बिहार हे दारूबाबत नेहनीच चर्चेचे केंद्र आहे. तरीही येथे दारू पिऊन मृत्यूच्या घटना घडत आहेत. तसे, जर तुम्ही लक्ष दिले तर दारूची समस्या फक्त बिहारपुरती मर्यादित नाही. ही समस्या देशभर चिंताजनक आहे. जवळपास सर्वच राज्यात अवैध दारूचा धंदा जोरात सुरू आहे. दरवर्षी लाखो लिटर अवैध दारू जप्त केली जाते. तरीही बेकायदेशीर दारू निर्मितीवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

Alcohol habit
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला पुन्हा खडसावलं; म्हणाले,"दहशतवादाला..."

बिहार, गुजरात, मिझोराम, नागालँड आणि लक्षद्वीपमध्येही दारूवर बंदी आहे. म्हणजेच येथील दारूला सरकारचा परवाना नाही. पण इथे दारू पिली जात नाही असे नाही. बनावट दारूमुळे मृत्यू होत असल्याचे येथील आकडेवारीवरून दिसून येते. गुजरात हे पहिले राज्य होते जिथे दारूवर बंदी घालण्यात आली होती. तरीही एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये 6 वर्षात अवैध दारू पिल्याने 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. अवैध दारूचा धंदा किती मोठा आहे?

भारतातील लोक किती लिटर दारू पचवतात

भारतात एका वर्षात सुमारे 5 अब्ज लिटर दारू पिली जाते, असा अंदाज आहे. यामध्ये 40 टक्क्यांहून अधिक दारू बेकायदेशीरपणे बनवली जाते. बेकायदेशीर दारू अधिकृत दारूपेक्षा थोडी स्वस्त आहे. ग्रामीण भागात देशी दारूला अधिक महत्त्व दिले जाते. जागतिक आरोग्य संघटनेचा असा अंदाज आहे. भारतात दरवर्षी वापरल्या जाणार्‍या दारूपैकी निम्मी दारू बेकायदेशीररीत्या बनवली जाते.

Alcohol habit
Alcohol Odor : दारु पिल्यानंतर तोंडाचा वास येऊ नये म्हणून काय करावे?

सरकारच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये 1 एप्रिल 2016 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 2.25 अब्ज लिटर अवैध दारू पकडली गेली आहे. बिहारमध्ये दारू बंदी आहे. त्यामुळे कायदा मोडल्याबद्दल 6.7 लाखांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

दारू पिण्यामध्ये स्त्रीयांची संख्याही लक्षणीय

भारतात स्त्रिया देखील भरपूर दारू पितात. भारतात दारू पिणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सायन्स जर्नल लॅन्सेटच्या अभ्यासात असे म्हटले आहे की 1990 ते 2020 दरम्यान दारू पिणाऱ्या लोकांमध्ये 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Alcohol habit
Alcohol : वाठारला बाटली राहणार आडवीच; गावात वाईन शॉप, बीअर बारला विरोध

2020 मध्ये  केलेल्या लॅन्सेटमधील अभ्यासानुसार 15 ते 39 वयोगटातील सुमारे 5.4 दशलक्ष महिला आणि 80 दशलक्ष पुरुष दारू पितात. मध्यमवयीन लोकांबद्दल बोलायचे झाले तर 40 ते 64 वयोगटातील 29.50 लाख महिला आणि 3.88 कोटी पुरुष दारू पितात. तर 65 वर्षांवरील 57.70 लाख स्त्री-पुरुष दारू पितात.

Alcohol habit
Rishabh Pant : पंत IPL 2023 मधून बाहेर? हा खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाचा दावेदार

एकूणच भारतात दारू पिणाऱ्यांची संख्या १३.२७ कोटींहून अधिक आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 नुसार, भारतातील सुमारे 20 टक्के लोक दारूचे सेवन करतात. अहवालात असे म्हटले आहे की. खेड्यातील 20 टक्के पुरुष दारू पितात, तर शहरात राहणारे सुमारे 17 टक्के लोक दारूचे सेवन करतात.डब्ल्यूएचओच्या मते, भारतात दारूचे सेवन खूप वेगाने वाढले आहे. 2009 मध्ये, एक सामान्य भारतीय एका वर्षात सुमारे 3.8 लिटर दारू प्यायचा, जो 2019 मध्ये 5.6 लिटरपर्यंत वाढला.

लोक मरतायत तरी दारूबंदी का होत नाही.

देशातील काही राज्यांमध्ये दारूवर बंदी आहे. अशी काही राज्ये आहेत जिथे आधी दारूवर बंदी होती. पण आता सरकार तिथे दारू पिण्यास परवानगी देते. उदाहरणार्थ, १९९६ मध्ये हरियाणामध्ये दारूवर बंदी घालण्यात आली होती. पण लवकरच दारूबंदीचे नियम काढून टाकण्यात आले. आंध्र प्रदेशातही असेच झाले, 1995 मध्ये दारूवर बंदी घालण्यात आली, पण 1997 मध्ये दारूबंदीचा नियम मागे घेण्यात आला.

Alcohol habit
Women Nature : पुरुषांनी महिलांना या गोष्टी चुकूनही विचारू नये, कारण...

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालात असे म्हटले आहे की, देशातील अनेक राज्यांच्या कर महसुलाच्या 10 ते 15 टक्के महसूल दारूतून मिळतो. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसारख्या अनेक राज्यांमध्ये दारूपासून 20 टक्क्यांहून अधिक महसूल मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com