मोदी आणि अमित शहांनी देशाचे वाटोळं केलं : केजरीवाल

मोदी आणि अमित शहांनी देशाचे वाटोळं केलं : केजरीवाल

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ''आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याची गरज आहे. अमित शहा आणि मोदींनी देशाचे वाटोळं केलं. त्यांनी देशातील जनतेच्या मनात विष पेरले''.

पंजाबच्या संग्रुर येथे पत्रकारांशी बोलताना केजरीवाल यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, ''अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी देशाचे वाटोळं केले. त्यांनी देशातील जनतेच्या मनात विष पेरले. जर ते पुन्हा सत्तेत आल्यास त्यांच्याकडून देशाचे विभाजन केले जाईल. त्यांच्याकडून संविधानाची हत्या केली जाईल. ते संविधानाला जीवंत राहू देणार नाही.

तसेच ते पुढे म्हणाले, ''पंजाबची जनता अकाली दल आणि काँग्रेसच्या सरकारवर निराश आहे. त्यामुळे आता राज्यातील जनतेला बदल हवा आहे. या सरकारने जनतेला दिलेली वचनं पाळली नाही. राज्यातील जनता त्यांच्या सरकारवर नाराज आहे''.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्व जागा लढविणार आहे. येत्या 10-12 दिवसांत आम्ही आमच्या उमेदवारांची नावांची घोषणा करणार आहोत. या निवडणुकीत आम्ही जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com