

India Pakistan Border Security statement amit shah
esakal
Amit Shah smart border project : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भारताच्या सीमासुरक्षेबाबत मोठी घोषणा केली. पाकिस्तान आणि बांग्लादेश सीमाभागाला पुढील एका वर्षात ६ हजार किमीची अभेद्य किल्ल्यासारखी मोठी भींत बांधण्यात येईल. केंद्र सरकार ‘स्मार्ट बॉर्डर’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सीमावर्ती भागात मजबूत सुरक्षा कवच उभारले जाणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली.