विरोधकांचे मतांचे राजकारण संपेल - अमित शहा

Amit-Shah
Amit-Shah

बंगळूर - काँग्रेस, बीएसपी, एसपी आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह काही विरोधी पक्षांचे नेते नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत खालच्या पातळीवरून आरोप करीत आहेत. जनतेला चुकीचा मार्ग दाखवत आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हुबळी येथे बोलताना केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी झाल्यास त्यांचा व्होटबॅंकेच्या राजकारणाचा मार्ग चुकणार असल्याचा टोलाही लगावला.

हुबळी येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते. अमित शहा पुढे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या वेळी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील अत्यंत क्‍लिष्ट अशा समस्यांचे निवारण केले आहे. कधीच सुटणार नाहीत, अशा समस्या त्यांनी सहजरीत्या दूर केल्या आहेत. सीएए कायदा हा नागरिकत्व बहाल करणारा कायदा आहे. काँग्रेसने धर्माच्या आधारे या देशाचे विभाजन केले असल्याचा आरोप त्यांनी केला.’’ 

शहा म्हणाले की, राहुल गांधी यांचे आजोबा नेहरू यांनी लियाकत अली यांच्याबरोबर करार केला. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमध्ये हिंदूंचे संख्याबळ दिवसेंदिवस कमी होत आहे, तर भारतामध्ये अल्पसंख्याकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या तीन देशांतून अल्पसंख्याकांचे खून झाले. धर्मांतर करण्यात आले. भारताने मात्र शरणागती पत्करली.

अफगाणिस्तानच्या सरकारने धार्मिक अल्पसंख्याकांना शिक्षण, आरोग्य व मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवले. पीडितांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कायदा आणला आहे. यासाठी काँग्रेस, कम्युनिस्ट, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांसारखे नेते विनाकारण केंद्र सरकार विरुद्ध ओरड करीत आहेत. या कायद्यामुळे त्यांना काय त्रास होणार? असा प्रश्न अति शहा यांनी या वेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com