युद्ध हे केवळ सैन्यातच नसते, त्यात संपूर्ण देशाचे प्रयत्न असतात: लष्करप्रमुख मनोज पांडे

देश पराभूत होत असेल तर त्याच्या मागचे कारण हे रसद असते
Army Logistics Conference
Army Logistics Conferenceesakal

भारतीय लष्कराकडून आर्मी लॉजिस्टिक कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते. यावेळी लष्कराच्या आधुनिकीकरणा पासून युद्धाच्या परिणामांवर चर्चा करण्यात आली. यावेळी लष्कर प्रमुखांनी भाषणही केले.

युद्धावर चर्चा करताना ते म्हणाले की, युद्धे केवळ सैन्यातच होत नाहीत तर त्यात संपूर्ण देशाचा प्रयत्न असतात. युद्धे राष्ट्रीय लवचिकतेची चाचणी घेतात आणि देशाची साधने आणि क्षमता वाढवतात. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष हे त्याचे ताजे उदाहरण आहे.

लष्करी कारवाईला गती देण्यासाठी पुरेसा रसद पुरवठा आवश्यक

पांडे यांनी सांगितले की जर एखादा देश हारत असेल तर त्याच्या मागचे कारण हे रसद असते. लष्करी कारवाईचा वेग, तीव्रता आणि पोहोच यासाठी पुरेसा रसद पुरवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी रसदेवर विषेश लक्ष दिले पाहिजे. मनोज पांडे म्हणाले की, कार्यक्षम संयुक्त लष्करी-नागरिक रचनां लागू करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि चीनने उचललेली पावले या विषयाशी निगडीत अधोरेखित करतात.

त्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत, सरकारने देशातील लॉजिस्टिकला एकत्रित करण्यासाठी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण धोरणे तयार केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com