नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूका व सीएए-एनआरसीविरोध यामुळे देश अस्थिर बनलाय. अशातच दिल्ली निवडणूकांमुळे प्रचारसंभांचीही रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षातील मोठ-मोठे नेते दिल्लीत प्रचारसभा घेताना दिसताहेत. याच सभांमध्ये एकमेकांवर टीकेची झोड उठवणंही जोरदार सुरू आहे. भाजप नेत्यांची वादग्रस्त विधाने करण्याची स्पर्धा सुरू असतानाच आता त्यात एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसीही उतरले आहेत.
ओवेसींनी चक्क दिल्लीत निवडणूका झाल्यावर मोठी घटना घडणार असे भविष्यच वर्तवले आहे. ८ फेब्रुवारीला दिल्लीच्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शाहीन बागेचे रूपांतर हे जालियनवाला बागेत होईल असे वक्तव्य केले आहे. एकदा निवडणूका झाल्या की शाहीन बागेतील सीएए विरोधी आंदोलकांवर गोळीबार केला जाईल. भाजपच्या मंत्र्यानेच तशा घोषण दिल्या आहेत, त्यामुळे सरकारने याचे उत्तर द्यावे असे ओवेसींनी संसदेतून बाहेर पडल्यावर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर दिले.
दिल्लीत एका प्रचारसभेत बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उपस्थितांकडून 'देश के गद्दारों को गोली मारो सालों को' अशा घोषणा वदवून घेतल्या. त्यामुळे अनुराग ठाकूर नक्की कोणाला गोळ्या मारणार आहेत, हे त्यांनी सांगावे असा सवाल ओवेसी यांनी यावेळी केला.
शाहीन बागेतील मुस्लिम समाजाचे सीएएविरोधी आंदोलन तीव्र झाले असून, त्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. या आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा मार्गही बंद करावा लागला आहे, त्यामुळे भाजपचे काही नेते आक्रमक झाले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.