सावध राहा! देशात 'मुघल राज' येण्यास वेळ लागणार नाही : तेजस्वी सूर्या

Tejaswi Surya talks on Shaheen baag strike
Tejaswi Surya talks on Shaheen baag strike

नवी दिल्ली : संसदेतील तरूण आणि तडफदार खासदार म्हणूनओळखल्या जाणाऱ्या तेजस्वी सूर्या यांनी संसदेतील भाषणादम्यान असे काही वक्तव्य केले की त्याबद्दल आता चर्चा होत आहे. त्याने देशातील बहुसंख्यांकाना सावध करत एक वक्तव्य केलंय, त्याची जोरदार चर्चा होतीये. राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावादरम्यान झालेल्या चर्चे त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. 

सूर्या म्हणाले की, 'दिल्लीतील शाहीन बागेतील आंदोलन बघता देशातील बहुसंख्यांकांनी सतर्क राहायला हवे. कारण दिल्लीत मुघल राज येण्यास वेळ लागणार नाही...' असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या इशाऱ्यामुळे राजकीय स्तरांत जोरदार चर्चा सुरू झालीय.  'जुन्या जखमा भरल्याशिवाय न्यू इंडियाची निर्मिती होऊ शकत नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागररिकत्त्व देणं म्हणजे सीएए. विरोधकही सीएएचे महत्त्व जाणून आहेत, तरीही विरोधाला विरोध म्हणून ते आंदोलन करत आहेत.'

मोदी सरकारने केलेल्या विकास कामांची प्रशंसा यावेळी सूर्या यांनी केली. तसेच सीएए व एनआरसीचे महत्त्व समजावून सांगितले. ]

शाहीन बागेत मुस्लिमांकडून सीएए, एनआरसीविरोधात आंदोलने सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com