आसाम-मिझोराम सीमेवर तणाव, हिंसाचारानंतर केंद्राने बोलावली बैठक

assam main.jpg
assam main.jpg

गुवाहाटी- आसाम आणि मिझोरामच्या नागरिकांमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत. दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह सचिव अजयकुमार भल्ला सोमवारी दोन्ही राज्यांबरोबर होणाऱ्या बैठकीत सहभागी होतील. ही बैठक व्हिडिओ कॉन्परन्सिंगच्या माध्यमातून सकाळी 11.30 वाजता होणार आहे. बैठकीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवही उपस्थित राहतील. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पीएमओ आणि गृह मंत्रालयाला माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्री सोनोवाल यांनी मिझोरामचे मुख्यमंत्री जोराम थांगा यांना दूरध्वनीवरुम सीमेवर झालेल्या हिंसाचारावर चर्चा केली. सीमा वाद सोडवण्यासाठी आणि आंतरराज्या सीमेवर शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. 

मिझोरामचा आसामवर आरोप

दुसरीकडे मिझोरामने आसाम सरकारवर आरोप केले आहेत. मिझोराम येथील हिंसाचार झालेले वेरंगते गावाजवळ आणि आसाम येथील लैलापूर येथे सीआरपीएफचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आसाम सरकारने म्हटले आहे. हिसांचाराचे प्रकार दरवर्षी होतात, असे स्थानिक आमदार परिमल शुक्ला वैद्य यांनी सांगितले. दोन्ही बाजूचे लोक अवैधरित्या वृक्षतोड करतात त्यामुळे हिंसाचार होतो, असेही ते म्हणाले. 

शनिवारी सायंकाळी लाठ्या-काठ्या घेऊन आसाममधील काही लोक सीमेवरील गावाच्या बाहेरील भागात असलेल्या रिक्षा स्थानकाजवळ आले आणि त्यांनी एका जमावावर दगडफेक केली. त्यानंतर वेरंगते गावातील लोक मोठ्यासंख्येने एकत्र जमा झाले. संतापलेल्या जमावाने राष्ट्रीय महामार्गावरील लैलापूर गावातील सुमारे 20 झोपड्या आणि दुकाने पेटवून दिल्याचे कोलासिब जिल्ह्याचे पोलिस उपअधिक्षक एच लल्थलंगलियाना यांनी सांगितले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com