...जेव्हा वाजपेयी म्हणाले होते, मी राजीव गांधींमुळेच जिवंत

...जेव्हा वाजपेयी म्हणाले होते, मी राजीव गांधींमुळेच जिवंत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा भ्रष्टाचारी म्हणून उल्लेख केल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. आता काँग्रेसने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण मोदींना करून दिली आहे. यामध्ये वाजपेयी म्हणाले होते, की मी आज फक्त राजीव गांधी यांच्यामुळेच जिवंत आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितला होता. 1991 मध्ये राजीव गांधींची हत्या झाली होती. तेव्हा भाजप विरोधी पक्षात होते आणि अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी एका वरिष्ठ पत्रकाराने वाजपेयींना राजीव गांधी यांच्याविषयी विचारले? त्यावेळी वाजपेयींनी भावूक होऊन एक किस्सा सांगितला की, मी आज केवळ राजीव गांधी यांच्यामुळे जिवंत आहे.

वाजपेयी म्हणाले की, 1984-1989 या काळात राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. या काळात अटलबिहारी वाजपेयी किडनीच्या आजाराने त्रस्त होते. या आजारावर आपल्या देशात उपचार घेणे अवघड होते. उपचार घेण्यासाठी परदेशात जावे लागत असे. परंतु आर्थिक कारणास्तव परदेशात जाणे शक्य नव्हते. ही गोष्ट राजीव गांधींना माहिती पडली. त्यावेळी राजीव गांधीनी वाजपेयींनी त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले आणि सांगितले की तुम्हाला भारताकडून प्रतिनीधीमंडळासोबत संयुक्त राष्ट्राच्या बैठकीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यावेळी राजीव गांधींनी सांगितले की, वाजपेयीजी तुम्हाला यानिमित्त तुमच्या आजारावर उपचार करणे शक्य होईल. मी संयुक्त राष्ट्राच्या बैठकीला गेल्यावर उपचार घेऊ शकल्यानेच आज जिवंत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com