planes
sakal
नवी दिल्ली - इराण युद्धामुळे भारत आणि पश्चिम आशियातील देशांदरम्यान ये-जा करणाऱ्या दैनंदिन विमानांच्या संख्येत २५० ते २७५ ने घट झाली आहे. तसेच, गेल्या ३७ दिवसांत एकूण दहा हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाल्याची माहिती आज नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आली. तसेच, पश्चिम आशियातील देशांतून विमान प्रवास बंद असल्याने अमेरिका-युरोपला जाणाऱ्या विमानांना वळसा घालून जावे लागत आहे.