Badrinath Dham : मंत्रोच्चाराच्या जयघोषात बद्रीनाथ धामचे कपाट बंद!

At Badrinath Dham Kailasamath Adhikar Swami Samvidanand Saraswati, Badri-Kedar Temple Committee CEO Yogendra Singh along with other officials.
At Badrinath Dham Kailasamath Adhikar Swami Samvidanand Saraswati, Badri-Kedar Temple Committee CEO Yogendra Singh along with other officials.esakal

नाशिक : पृथ्वीवरील वैकुंठ ज्याला भूवैकुंठ मानले जाते असे हिमालयसहित भारतातील चार धामपैकी एक बद्रीनाथ धाम. शनिवार (ता. १९) रोजी मंत्रोच्चाराच्या गजरात विधीवत पुजा- अर्चा करुन बद्रीनाथ धामचे कपाट (द्वार) भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले.

यावेळी आर्मी बँडच्या उद्घोषात मोठ्या उत्साह अन् जल्लोषात परंपरेनुसार दुपारी ३ वाजून ३५ मिनीटांनी कपाट बंद करण्यात आल्याची माहिती बद्रीनाथ धाम येथून नाशिक येथील कैलास मठ अधिपती स्वामी संविदानंद सरस्वती यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

(Badrinath Dham closets closed amid chanting desh news)

At Badrinath Dham Kailasamath Adhikar Swami Samvidanand Saraswati, Badri-Kedar Temple Committee CEO Yogendra Singh along with other officials.
Water In Dream : तुम्हाला स्वप्नात पाणी दिसतं का? जाणून घ्या अर्थ
esakal

स्वामी संविदानंद सरस्वती म्हणाले, बद्रीनाथ हे भारतासह हिमालयातील चार धामपैकी एक धाम आहे. भगवान नर- नारायणाने येथे साठ हजार वर्षे तपश्चर्या केल्याची नोंद पुराणात आहे. भगवान नारायण ज्यावेळी येथे तपश्‍चर्या करत होते त्यावेळी प्रत्येक ऋतूत त्यांची अविरत सेवा करता यावी या हेतून देवी लक्ष्मीने येथे बोर वृक्षाचे रुप धारण केले. या वृक्षाला संस्कृत मध्ये ‘बद्री’ असे म्हणतात. जेव्हा भगवंतांची तपश्‍चर्या पुर्ण झाली त्यावेळी देवीची ही सेवा पाहून ते अत्याधिक प्रसन्न झाले अन् देवीला त्यांनी वर दिला की या स्थळाला आमच्या नावाच्या आधि तुझे नाव लागेल. आणि तेथून या तीर्थक्षेत्राचे ‘बद्रीनाथ’ असे नाम प्रचलित झाले.

भगवान नारायणाने स्वतः येथे तपश्‍चर्या केलेली ही पवित्र भुमी पुजनासाठी आद्य जगत् गुरू शंकराचार्य यांनी २ हजार वर्षांपुर्वी येथे पुजनासाठी रावल यांची नेमणूक केली. जे आजही येथे पुजा करतात. आद्य जगत् गुरू शंकराचार्यांनी २ हजार वर्षांपुर्वी सुरु केलेली ही परंपरा आजतागायत कायम आहे. शास्त्र परंपरेनुसार येथे सहा महिने देवाचे कपाट बंद केले जाते. या काळात भगवान बद्रीनाथाची पुजा देवर्षी नारद करतात, तर जेव्हा मंदिराचे कपाट उघडे असते तेव्हा मनुष्य येथे पुजा करतात.

At Badrinath Dham Kailasamath Adhikar Swami Samvidanand Saraswati, Badri-Kedar Temple Committee CEO Yogendra Singh along with other officials.
Shanidev Upay: शनिवारी हे उपाय केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होईल; सुखसमृद्धी अन् धनवाढही होईल
esakal

कठोर तपश्‍चर्येतून बद्रीनाथाची पुजा

बद्रीनाथ धाम येथे भगवंताची पुजा करणारे रावल हे मुळचे केरळचे. भगवंताचे पुजन करताना त्यांना कठोर नियमांचे पालन करावे लागते. जसे की येथे तापमानाचा पारा उणे १५ अंशापर्यंत खाली जातो. तरिही त्यांना दिवसातून किमान चार वेळा अंघोळ करावीच लागते.

मंदिराचे द्वार जेव्हा उघडे असतात तेव्हा एकही दिवस खाडा न पडू देता देवतेची पुजा करावी लागते. एक दिवस खाडा पडला तरी त्यांचे पुजारी पदाचे अधिकार कायमचे समाप्त होतात. ईश्वर प्रसाद नंबूदरी हे सध्या बद्रीनाथ धाम येथे रावल म्हणून पुजा करत आहेत.

At Badrinath Dham Kailasamath Adhikar Swami Samvidanand Saraswati, Badri-Kedar Temple Committee CEO Yogendra Singh along with other officials.
Astro Tips : नामस्मरण नेमकी कोणती माळ घेऊन करावे?
esakal

देवीच्या पुजनवेळी रावल धारण करतात स्त्री वेष

बद्रीनाथ धाम येथे पुराणातील उल्लेखानुसार देवी लक्ष्मीची देखील पुजा केली जाते. यासह ज्यावेळी भगवान नारायण मंदिराचे द्वार बंद होतात तेव्हा देवी लक्ष्मीची मुर्तीदेखील मंदिराच्या गर्भगृहात ठेवली जाते. बद्रीनाथ धामचे द्वार उघडल्यानंतर देवीची मुर्ती पुन्हा पुर्ववत स्थळी म्हणजे बद्रीनाथ मंदिराच्या प्रांगणात असलेल्या देवीच्या मंदिरात स्थापन केली जाते. यावेळी पुजा करणाऱ्या रावल यांना स्त्रीवेष धारण करावा लागतो अशी माहिती स्वामी संविदानंद यांनी दिली.

हिमालयात तापमानाचा पारा खाली आल्यानंतर मंदिरांचे द्वार भक्तांना दर्शनासाठी बंद केले जाते. यावेळी देवाची मंत्रोच्चाराच्या घोषात विधीवत पुजा केली जाते. यावेळी देवाला कुठलाही धातूयुक्त जसे की सोने, चांदीचा शृंगार न करतान वनमाळी म्हणजे फुलांचा शृंगार केला जातो. यासह मानागाव येथील कुमारीकांच्या हातून तयार झालेल्या कंबलाने घृतकंबल पुजा केली जाते.
यावेळी आर्मी बँडचा ध्वनी नाद केला जातो. यावेळी भारतीय लष्कराचे अधिकारी, जवान, मंदिराचे विश्‍वस्त तथा मोठ्या संख्येने भाविक- भक्त उपस्थित होते.

देवाच्या मंदिराचे कपाट बंद होऊन आता सहा महिने दर्शन होणार नाही याची खंत वाटते मात्र हेच सहा महिने उलटल्यानंतर मात्र देवाचे भक्तीभावाने दर्शन घेता येईल याचा निश्‍चीत आनंदही आहे असे स्वामी संविदानंद म्हणाले.

At Badrinath Dham Kailasamath Adhikar Swami Samvidanand Saraswati, Badri-Kedar Temple Committee CEO Yogendra Singh along with other officials.
Spiritual Facts : नक्षत्र म्हणजे काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com