हिंसेने फक्त नुकसान होते : मोहन भागवत 

हिंसेने फक्त नुकसान होते : मोहन भागवत 

नागपूर : भारत देश शांतता व अहिंसेच्या मार्गाने चालणारा देश आहे. हिंसेमुळे फक्त नुकसानच होते. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केले जाऊ शकते, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. भारत इतका बलवान बनावा की आक्रमण करण्याची कोणाची हिंमतच होऊ नये, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (गुरुवार) सांगितले.

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात भागवत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

भागवत यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

- ज्यांचा साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नाही, अशा इंग्रजांचा सामना महात्मा गांधीजींनी निशस्त्रपणे केला होता. 

- महात्मा गांधींनी फक्त नैतिक बळाच्या आधारावर इंग्रजांशी दोन हात केले. 

- देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या सर्वांची.

- आपल्या सुरक्षेसाठी जवान बलिदान देतात, हे समाजाचे दायित्व. 

- देशाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे ते आपल्या हातात.

- भारत देश शांतता व अहिंसेच्या मार्गाने चालणारा देश आहे.

- हिंसेमुळे फक्त नुकसानच होते.

-  भारत इतका बलवान बनावा की आक्रमण करण्याची कोणाची हिंमतच होऊ नये.

- सरकारसह समाजाची जबाबदारीही महत्वाची असते. 

- सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केले जाऊ शकते, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते.

- तसेच सरकारने कामाचा वेग वाढवण्याची गरज आता निर्माण झाली. 

- शस्त्रास्त्रात प्रबळ तोच सुरक्षित.

- आपल्या सुरक्षेसाठी आपण दुसऱ्यावर निर्भर राहू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com