

Election Two Child Norm
ESakal
राजस्थानमधील भजनलाल शर्मा सरकार राज्याच्या राजकारणात एक मोठा आणि दूरगामी बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारने स्पष्टपणे सूचित केले आहे की, पंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी दोन मुलांची अट रद्द केली जाईल. विधानसभेत सादर केलेल्या सरकारच्या उत्तरानुसार, तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेल्या व्यक्ती आता नगरपालिका आणि पंचायत निवडणुका लढवू शकतील.