Bihar Election: रात्री उशिरापर्यंत चालणार मतमोजणी, निवडणूक आयोगानं सांगितलं कारण

counting main.jpg
counting main.jpg

नवी दिल्ली Bihar Election 2020 -  बिहार विधानसभा निवडणुकीचा मतमोजणी सुरु असतानाच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत एक कोटींहून अधिक मतांची मोजणी झालेली आहे. पोलिंग बुथची संख्या यावेळी 63 टक्क्यांहून अधिक होती, असे निवडणूक उपआयुक्त चंद्रभूषण यांनी सांगितले. 2015 मध्ये 38 जागांवर पोलिंग बुथ होते. परंतु, यावेळी 58 पोलिंग बुथ आहेत. 

बिहारचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एचआर श्रीनिवास म्हणाले की, यावेळी सुमारे 4.10 कोटी मतदान झाले आहे. आतापर्यंत 92 लाख मतांची मोजणी झालेली आहे. पूर्वी 25-26 फेरीत मतमोजणी होत असत. यावेळी किमान 35 फेरीपर्यंत मतमोजणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु राहू शकते. 

मतमोजणी 19 ते 51 फेरीपर्यंत होऊ शकते. हे मत मोजणीवर अवलंबून आहे. आयोगाने 35 फेरींचा अंदाज लावला आहे. काही विधानसभांमध्ये मतमोजणीच्या 19 फेरी होऊ शकतात. तर काही ठिकाणी 51 फेऱ्या होण्याची शक्यता आहे. 

आयोगाने पुन्हा एका इव्हीएमच्या विश्वसनीयतेवर प्रतिक्रिया दिली. इव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून त्याच्यात कोणताच फेरफार करता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com