Bihar Election 2025 : ‘NDA’ समोर मोठा पेच!, चिराग पासवान नंतर जीतनराम मांझीही जागांसाठी अडून बसले

Jitan Ram Manjhi demand for bihar Election: जाणून घ्या, जीतनराम मांझी यांनी काय केली आहे मागणी अन् खास शायरीतून नेमकं काय म्हटलं आहे?
Chirag Paswan and Jitan Ram Manjhi during recent Bihar NDA meeting — both leaders firm on their seat-sharing demands ahead of the 2025 election.

Chirag Paswan and Jitan Ram Manjhi during recent Bihar NDA meeting — both leaders firm on their seat-sharing demands ahead of the 2025 election.

esakal

Updated on

NDA Faces Tough Seat-Sharing Challenge Ahead of Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे आणि दोन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. यानंतर आता बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आम आदम पार्टीने स्वबळाचा नारा देत पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे, तर बहुजन समाज पार्टीही स्वबळावरच ही निवडणूक लढवणार आहे.

दुसरीकडे सत्ताधारी एनडीए आघाडीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आधी चिराग पासवान नंतर आता जीतनराम मांझी हे जागांसाठी अडून बसल्याने, एनडीए आघाडीसमोर नवा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार, एनडीए आघाडीकडून जागा वाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले गेले होते. या बैठकीत चिराग पासवान यांच्या पाठोपाठ जीतनराम मांझी देखील आपल्या जागांची मागणी करत, त्यावरच अडून बसले आहेत. सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीतर यंदा निवडणूक लढणार नाही, अशी भूमिका मांझी यांनी घेतली आहे.

हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे प्रमुख आणि केंद्रीयमंत्री जीतनराम मांझी यांच्या वक्तव्यामुळे एनडीए आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जर आमच्या पक्षाला १५ पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर आम्ही निवडणूक लढवणार नाही परंतु एनडीएमध्येच राहू.

Chirag Paswan and Jitan Ram Manjhi during recent Bihar NDA meeting — both leaders firm on their seat-sharing demands ahead of the 2025 election.
Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

त्यांच्या या विधानामुळे हे स्पष्ट होते की, एनडीए आघाडीत अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. तसेच मांझी यांनी असंही स्पष्ट केलं आहे की, या विषयावरील निर्णय त्यांच्या पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत घेतला जाईल.

Chirag Paswan and Jitan Ram Manjhi during recent Bihar NDA meeting — both leaders firm on their seat-sharing demands ahead of the 2025 election.
Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

मांझी यांनी शायरीतून दिला संदेश –

जीतनराम मांझी यांनी एक्सवर एका खास शायरीद्वारे म्हणाले, “हो न्याय अगर तो आधा दो, यदि उसमें भी कोई बाधा हो, तो दे दो केवल 15 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, HAM वही ख़ुशी से खाएंगे, परिजन पे असी ना उठाएंगे.” जीतनराम मांझी यांची ही शायरी केवळ भावनात्मक संदेश देत नसून, एनडीए आघाडीच्या नेतृत्वास घटक पक्षाला सन्मान दिला जावा असाही संदेश देत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com