

Nalanda mid day meal incident
esakal
बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील नूरसराई ब्लॉकमधील परासी येथील एका सरकारी माध्यमिक शाळेत मंगळवारी दुपारचे जेवण (मिड-डे मील) घेतल्यानंतर ३४ विद्यार्थी आजारी पडले.शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, जेव्हा मुलांनी जेवणासोबत अतिरिक्त मीठ मागितले, तेव्हा स्वयंपाकी महिलेने चुकून मिठाऐवजी डिटर्जंट पावडर दिली.यामुळे मुलांची तब्येत बिघडली.