नवी दिल्लीः भाजपला रोखणं हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं नितीश कुमार म्हणाले आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दलही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आज नितीश कुमार यांनी २०२५ मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुका तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या जातील, असं जाहीर केलं आहे. शिवाय २०२४मध्ये भाजपला पराभूत करणं आमचं लक्ष्य असल्याचं नितीश कुमारांनी सांगितलं आहे.
हेही वाचाः इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
आरजेडीचे प्रदेधाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी सोमवारी नितीश कुमार हे पीएम मटेरियल असल्याचं म्हटलं होतं. त्यावर बोलतांना नितीश यांनी आपल्याला पंतप्रधान बनण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं आहे. सर्व विरोधक भाजपला हटवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असंही नितीश यांनी सांगितलं.
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचा स्थापन करण्यात आलेली आहे. आज विधानसभेतल्या सेंट्रल हॉलमध्ये महायुतीमधील घटकपक्षांची बैठक झाली. यामध्ये जेडीयू, राजद, काँग्रेस या पक्षांसह डाव्या पक्षांच्या नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हाच प्रयोग देशामध्ये राबविला जावू शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.