
Supreme Court rejects BJP plea in Revanth Reddy speech case
Esakal
BJP Defamation Case: सर्वोच्च न्यायालयाने २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तेलंगनाचे मुख्यमंत्री ए रेवंथ रेड्डी यांच्या भाषणाविरोधात दाखल केलेल्या मानहानी याचिकेवरून भाजपलाच फटकारलंय. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, न्यायालयाला राजकारणाचं मैदान बनवणं योग्य नाही. जर तुम्ही राजकीय नेते आहात तर तुमचं कातडंही जाड असायला हवं. सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सुप्रीम कोर्टाच्याच आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली.