नवी दिल्ली : वायनाड येथून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. अमेठी मतदारसंघात पुन्हा पराभव समोर दिसल्याने ते आता पळाले, अशी खोचक टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे. तर काँग्रेसने प्रत्युत्तर देताना भाजपला उठता बसता केवळ राहुल गांधी दिसत असून यातून त्यांची पराभवाची भीती स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसने पहिल्याच यादीत वायनाडमधून राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते याच मतदारसंघातून निवडून आले होते. अमेठी या मतदारसंघातून त्यांचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. ते पुन्हा अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु यासंदर्भात काँग्रेसने कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. वायनाडच्या उमेदवारीवरून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, राहुल गांधी यांनी अमेठीतील पराभव दिसू लागल्याने सुरक्षित जागा म्हणून वायनाड मतदारसंघ निवडला आहे. काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ सोडून ते कायमचे पळाले आहेत, असा खोचक टीका त्यांनी केली.
राहुल यांच्या नेतृत्वाची भीती
भाजपच्या टीकेला काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, भाजपच्या नेत्यांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची भीती आहे. त्यामुळे काहीही झाले की, ते राहुल गांधी यांच्यावर टीका करीत राहतात. अमेठी हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. उत्तरप्रदेशातील मतदारसंघाच्या उमेदवारांची निवड व्हावयाची आहे. ही वस्तुस्थिती न पाहता राहुल गांधी यांना लक्ष्य करतात. यातून भाजपच्या नेत्यांमध्ये असलेली भीती दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.