अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून त्यांच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज (शुक्रवार) मांडण्यात आला. या अर्थसंकल्पावरून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, की ''देशातील गरीब व वंचित जनतेला समर्पित असा हा अर्थसंकल्प असून, शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपये देण्याच्या घोषणेमुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे''.
2019-20 या वर्षासाठी मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी मांडला. त्यांच्या या अर्थसंकल्पानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर नितीन गडकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणाले, ''यंदाचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असून, देशातील गरीब, कामगार, वंचित, शेतकरी आणि मध्यमवर्गीय सर्वांनाच दिलासा देणारा ठरला आहे. देशातील मध्यमवर्ग विविध समस्यांचा सामना करत असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी हा फायद्याचा ठरणार आहे''.
दरम्यान, या अर्थसंकल्पातून उच्च मध्यमवर्गीय नागरिकांचेही समाधान झाले आहे. यामुळे देशातील 40 ते 50 कोटी लोकांना याचा थेट फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.