
भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून ७ मे रोजी गोळीबार करण्यात आला होता. यात कोणतंही नुकसान झालं नसून भारतीय हवाई दल पूर्णपणे सतर्क होते. एअर डिफेन्स सज्ज असल्यानं पाकिस्तानी हल्ले परतवून लावले. त्यानंतर ८ आणि ९ मे च्या रात्री पाकिस्तानकडून भारतातील शहरांवर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न झाला. मात्र हे हल्लेही भारताने हाणून पाडल्याचं एअर मार्शल एके भारती यांनी सांगितलं.