

mamata_banerjee
sakal
पुरुलिया : ‘‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूतकाळात केलेल्या कृत्यांसाठी त्यांच्यावरच ‘आरोपपत्र’ दाखल व्हायला हवे,’’ असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी तृणमूल सरकारवर टीका करणारी ‘आरोपपत्र’ ही पुस्तिका प्रकाशित केली होती, त्यावरून ममता यांनी आज त्यांच्यावर टीका केली.