संपूर्ण देश आज स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, तुम्हाला विश्वास बसनार नाही की देश स्वातंत्र होवून 75 वर्षे झाली, पण छत्तीसगड मधील बस्तर जिल्हातील एका गावात देश स्वतंत्र्या नंतर पहिल्यादा तिरंगा फडकवण्यात आला आहे. हे छत्तीसगड आणि ओडीसा राज्याच्या सीमेलगत चांदामेटा गाव आहे, आत्ता पर्यंत त्या गावावर नक्शलवाद्याची हुकूमत होती.
नक्शलवादी त्यांच्या मुलांना येथे प्रशिक्षन देत होते, आणि लोक त्याला नक्शलांची राजधानी मानत होते. पण आता सरकार आणि सैनिक यांच्या कारवाई मुळे नक्शलांच वर्चस्व संपल आहे.आणि त्या गावावर सैनिकांनी ताबा मिळवला आहे. आणि आता त्या भागात लष्करी तुकड्याचे कॅम्प उभारण्यत आला आहेत. दरम्यान गावात 75 वर्षानंतर जवानांन सोबत मिळून गावकऱ्यांनी तिरंगा फडकवला.
सकाळ पासुनच गावीतील लोक कॅम्प परिसरात एकत्र यायला लागले होते. त्या कॅम्प मध्ये जिल्हा बल आणि CRPF जवानां सोबत झेंडावंदन केले. त्या नंतर गावात पण वृध्द व्यक्तीच्या हस्ते झेंडा फडकवला. आणि गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली. माओवादी एकेकाळी काळे झेंडे फडकवत असत, पण आता बस्तरमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसत आहे. यामुळेच जिथे एकेकाळी काळा झेंडा फडकवला जायचा तिथे आता काळ्या ध्वजाची जागा तिरंग्याने घेतली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच चांदमेटा गावात तिरंगा फडकवण्यात आला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.