चोक्‍सीचा 'एसबीआय'ला झटका; थकवले 405 कोटी

चोक्‍सीचा 'एसबीआय'ला झटका; थकवले 405 कोटी

मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहारांमुळे परदेशी पळून गेलेल्या मेहूल चोक्‍सीने भारताचे नागरिकत्व सोडल्यानंतर बॅंकांना जाग आली आहे. चोक्‍सीने 405 कोटींचे कर्ज बुडवले असल्याचा दावा भारतीय स्टेट बॅंकेने बुधवारी (ता.23) केला.

चोक्‍सीने गीतांजली जेम्ससह इतर कंपन्या आणि कुटुंबीयांसाठी मुंबई, रायगड, नाशिक, हैदराबाद आदी ठिकाणी स्थावर मालमत्तेसाठी "एसबीआय'कडून कर्ज घेतले आहे. कर्जवसुलीसाठी बॅंकेने 31 डिसेंबर रोजी धाडलेली नोटीस परत आल्याने "एसबीआय'ला झटका बसला आहे. विशेष म्हणजे पीएनबी घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच "एसबीआय"ने चोक्‍सीच्या थकीत कर्जाची माहिती जाहीर केली आहे. 

"पीएनबी'मध्ये 13 हजार 500 कोटींच्या गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार असलेल्या नीरव मोदीसह चोक्‍सीही सहभागी होता. आर्थिक घोटाळा उघड होण्यापूर्वीच नीरव मोदी आणि चोक्‍सी यांनी कुटुंबीयांसह परदेशी पलायन केले. चोक्‍सीने दोनच दिवसांपूर्वी भारताचे नागरिकत्व सोडले आणि वेस्ट इंडीजमधील अँटिग्वा आणि बर्म्युडा या देशाचे नागरिकत्व पत्कारले आहे. यामुळे चोक्‍सीच्या प्रर्त्यापणाचा मार्ग खडतर बनला असून, बॅंकांसाठी कर्जवसुली डोकेदुखी ठरणार आहे. भारतीय स्टेट बॅंकेने चोक्‍सीकडून 405 कोटींचे येणे बाकी असल्याचे म्हटले आहे.

चोक्‍सीच्या कुटुंबीयांना आणि कंपन्यांना मुंबई, रायगड, नाशिक आणि हैदराबाद येथील मालमत्तांसाठी "एसबीआय'ने कर्ज मंजूर केले होते. त्याच्या राहत्या पत्त्यावर 31 डिसेंबर रोजी बॅंकेकडून नोटीस पाठवण्यात आली, मात्र ती परत आल्याने "एसबीआय'चे धाबे दणाणले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com